पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अरण्याचे अतरंग ❤️

इमेज
गौतम बुद्ध आणि त्यानंतर हेन्री डेव्हिड थोरो उर्फ थोरो गुरुजी यांच्याबद्दल आणि यांनी लिहलेलं साहित्य वॉल्डन,केपकॉड वाचल्यापासून निसर्ग,प्राणी,पक्षी आणि पर्यावरणाची खूप आवड निर्माण झाली आहे.निसर्ग आणि प्राण्यांच्या सानिध्यात जीवन जगावं असं आता नेहमी वाटतं असतं.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी चांगलं कार्य करावं,वेगवेगळी झाडे लावावी आणि ती जगवावी,प्राण्यांच्या सानिध्यात जावं त्यांच निरीक्षण करावं असं आता प्रामुख्याने वाटायला लागलं आहे.आणि लवकरच सुरुवात करणार आहेच.लहानपणी जंगलबुक बघितल्यापासूनच ही इच्छा कायम मनात होती आणि आता ती कितीतरी पटीने वाढलेली  चाललेली आहे. निसर्ग,प्राणी व पक्ष्यांची आवड लागली म्हटल्यावर या संबंधित वाचन सुद्धा आलंच.यामुळे मी आता निसर्ग साहित्याकडे मोर्चा वळवला आहे.एकंदरीत हा जेनर माझा आवडता बनत चालला आहे.चकवा चांदण,डॉ.सलीम अली,भारतीय पक्षी, वॉल्डन,निसर्गमित्र जॉन म्युर,बनकीस्सा,शेकरा,नदिष्ट,माचीवरला बुधा,सत्तांतर इत्यादी या विषया संबंधित काही पुस्तके मी वाचली असून अजून कितीतरी पटीने पुन्हा खूप काही वाचायचं बाकी आहे.मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर इत्यादी लेखक माझ्...

कोल्हाट्याचं पोरं 🖤

इमेज
हे पुस्तक वाचत असताना नेहमी मला एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे खालील बोल आठवतात. "दुनिया में कितना गम हैं,मेरा गम कितना कम हैं, लोगो का गम देखा तो,मैं अपना गम भूल गया.🥺 ठीक या Lyrics प्रमाणे मी स्वतःच दुःख विसरून जातो.मला माझे दुःख या लेखकासमोर नगण्य वाटायला लागतात.आपले आयुष्य किती सुखद आहे ही भावना मनात निर्माण होते.सर्वकाही असताना आपल्याला अजून काय हवंय ?आपल्याला जे मिळालं आहे ते असंख्य जणांचा स्वप्न आहे या गोष्टीची मला जाणीव हे पुस्तक वाचून झाली. असंख्य वेदना झेलून,समस्यांचा सामना करून लेखक जेव्हा शेवटी डॉक्टर होतो तेव्हा उर भरून तर येतोच.प्रचंड आनंद सुद्धा होतो.पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी केलेली धडपड आणि मेहनतीचा विसर आपल्याला पडत नाही.त्यांच बालपण एवढ्या खडतर आणि वाईट परिस्थितीत गेलं ह ी गोष्ट कोठेतरी मनात काट्यासारखी टोचत राहते. काही वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचलं.आणि तेव्हापासून कमीत कमी 4 वेळा वाचून पूर्ण केलं असेल.जेव्हा सुद्धा माझ्या आयुष्यात मला काही अडचणी,दुःख जाणवतात तेव्हा मी हे पुस्तक चाळत असतो.हे पुस्तक वाचून मला ते दुःख,अडचणी खूप शुल्लक वाटायला लागतात..लेखक...

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील पुस्तक खरेदी...♥️

इमेज
मी रोज विचार करत असतो की आता माझ्याजवळ खूप पुस्तके गोळा झाली आहेत.एकंदरीत आता (काही अपवाद वगळता) सर्वंच दर्जेदार पुस्तके आपल्या संग्रहात आहेत.आता स्टडी बंकर मध्ये पुस्तके ठेवायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही..दोन्ही रॅक आणि कपाट पूर्ण भरलं आहे.त्यामुळे आता सध्या नवीन पुस्तके घ्यायची नाहीत.पण जेव्हा सुद्धा इतर नवीन पुस्तकांबद्दल वाचतो,इतरांचा पुस्तक संग्रह बघतो तेव्हा पुन्हा एक नवीन प्रेरणा मिळते. आपण जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करून संग्रही करायची आणि ती वाचायची.आपली सध्या ही तर फक्त सुरुवात आहे. अजून कितीतरी पटीने असंख्य भरपूर पुस्तके वाचायची आहेत. संग्रही ठेवायची आहे. फक्त आणि फक्त पुस्तकांच्या साठी राजगृह बांधणाऱ्या त्या बाबासाहेबांचा डोळ्यासमोर आदर्श आहे.. त्यामुळे कधी थांबायचं प्रश्नच येत नाही.स्वतःची एक लायब्ररी बनवायची आहे.त्या लायब्ररी मध्ये प्रत्येक विषयाची दर्जेदार आणि वाचनीय पुस्तके संग्रही करून ठेवायची आहे.ही पुस्तके जिवापार जपायची आहे.आजूबाजूच्या ग्रामीण भागातील मुलामुलींना सुद्धा वाचनाची आवड निर्माण करून पुढे ही लायब्ररी सर्वांसाठी खुली करायची आहे. एकच व्यसन आहे...

जिवलग मित्राला लिहलेलं पत्र ❤️

इमेज
माय डियर Harshal ♥️ लव यु फॉरेव्हर !! कसा आहेस ? तु नेहमीप्रमाणे ठीक असशील ही खात्री आहे. आणि तुझा अभ्यास सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने सुरू असेल यात काही वाद नाही.तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला हे तुला सुद्धा माहिती आहेच.आणि तु त्या पूर्ण करणार यात काहीच वाद नाही. (हे वाचून Pressure वगैरे घेऊ नको बरं का ) तुला बघून माझ्यासारख्या मुलाला उच्चशिक्षणाची प्रेरणा मिळाली आहे.तुझी जिद्द,इच्छाशक्ती,आत्मविश्वास आणि उच्चशिक्षणासाठी असलेली धडपड बघून खूपच भारी वाटतं मला. स्वतःसाठी जगणारे,शिकणारे खूप असतात रे पण इतरांसाठी जगणारे,धडपडणारे खूप कमी असतात आणि यातूनच तु एक आहेस.याचा मला अभिमान आहे आणि कायम असणार आहे. आयुष्यात एवढं खडतर प्रवास,संघर्ष करून तु कधी थांबला नाही आणि योग्य त्या मार्गावर चालत राहिला आणि इतरांना नेहमी शिक्षणासाठी प्रेरणा देत राहिला हे खूप महत्त्वाचं आहे.यासाठी तुला घट्ट मिठी. (तूर्तास माझ्याकडून मारून घे ) तु त्या दिवशी मला फोनवर विश्वासाने तुझ्या भूतकाळाबद्दल सर्वकाही सांगितलं. तेव्हा मी निःशब्द झालो होतो गड्या.तेव्हा काय रिऍक्ट करावं काय बोलावं ? हेच मला कळतं नव्हत...

माझी मुंबई डायरी ♥️ भाग - 2

इमेज
औरंगाबाद येथे ट्रेन मध्ये येऊन बसलो.पण मला येथे खूपच अवघड वाटतं होतं.रात्रभर आपल्याला येथे व्यवस्थित झोप येणार नाही.एवढं काहीच मिनिटांत मला कळून चुकलं. त्यामुळे मी ट्रेन मध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आणि बाहेर आलो.. खर्च करून काढलेलं रेल्वे तिकीट बॅगेत नाईलाजाने तसाच ठेऊन दिला.(फाडायची हिम्मत झाली नाही) बाहेर येऊन एक कप चहा घेऊन जवळच्या एका ट्रॅव्हल्स ऑफिस मधून एक स्लीपर बसचा तिकीट घेतला. बसची वेळ होती 10.30 जी बाबा पेट्रोल पंपाजवळून पिकअप करणार होती.जवळच्या हॉटेलमध्ये मध्ये एक बिर्याणी खाऊन मी ऑटोने बसजवळ आलो आणि बसमध्ये येऊन बसलो.. रात्री ठीक 11 वाजता बस औरंगाबाद वरून मुंबईला निघाली.बस निघाल्यावर मी सोबत आणलेलं डॉ.सलीम अली हे वीणा गवाणकर मॅमच पुस्तक वाचत बसलो.वाचता वाचता कधी झोप लागली हे कळलंच नाही..सकाळी 7.45 ला मी दादर वेस्ट रेल्वे स्टेशनजवळ उतरलो..स्टेशनवर येऊन फ्रेश होऊन एक चहा घेतली.(अजिबात आवडली नसल्याने अर्धी तशीच फेकून दिली😢)स्टेशनवर 15 मिनिटं थांबून आजूबाजूचं निरीक्षण केलं.आजपर्यंत टीव्हीवर बघितलेलं मुंबईच धावपडीचं जीवन थोडक्यात बघितलं. बाहेरील भाजी ...

एकलव्य ❤️

इमेज
मला एकलव्य बद्दल माहिती मिळाली ती Harshal कडून. सर्वप्रथम जेव्हा त्याच्याकडून विस्तृतपणे एकलव्य आणि करत असलेल्या त्यांच्या ग्रेट कार्याबद्दल ऐकलं तेव्हा फारच आनंद झाला.असं सुद्धा काही असेल कोणी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करत असेल याची कधीही कल्पना केली नव्हती.आपण सुद्धा TISS, APU,JNU सारख्या विद्यापीठात जाऊन शिक्षण घेऊ शकतो हा आत्मविश्वास त्याच्या बोलण्यातून मला आला.आणि उच्चशिक्षण घेण्याची माझी मेलेली इच्छा पुन्हा नव्याने जिवंत झाली.JNU चा आजपर्यंत नाव ऐकलं,बऱ्याच प्रमाणात वाचलं होतं पण त्यामध्ये जाऊन कधी शिक्षण घेण्याचं स्वप्न तर काय विचार सुद्धा केला नव्हता.पण आता मी हा स्वप्न बघू शकतो तो फक्त माझा मित्र हर्षलने दिलेल्या आत्मविश्वासामुळे .आणि एकलव्य सारखी संस्था मार्गदर्शन करायला पाठीशी आहे या विश्वासामुळे.माझ्या सारख्या असंख्य जणांना एकलव्यने नव्याने स्वप्न बघायला शिकवलं आहे.पंखांना बळ देऊन उंच भरारी घेण्यासाठी प्रवृत्त केलं आहे.आणि वर्तमानात तर दिसत आहेच पण भविष्यात याचे सकारात्मक परिणाम अजून कितीतरी पटीने जास्त दिसतील एवढं नक्की. उच्चशिक्षित होण्याचं स्वप्न माझ्यासारख्य...

हू मुव्हड माय चीज ? ❤️

इमेज
"परिवर्तन संसार का नियम हैं " ही म्हण आपण अनेक वेळा ऐकत आलोय.योग्य वेळेवर बदल स्वीकारणे अथवा बदल करणे खुप गरजेचं असते.या वाक्याची प्रचिती आपल्याला हे पुस्तक वाचताना येते.हे एक छोटसं पण खूप काही शिकवून जाणारं पुस्तक अप्रतिम आहे.आयुष्यात येणाऱ्या बदलांना कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दल हे पुस्तक आपल्याला कमालीचं मार्गदर्शन करते.कितीतरी महत्वपूर्ण धडे आपल्याला शिकायला मिळतातं.पुस्तकातील वेगवेगळे विचार आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडतात. कथेतील पात्रापैकी आपण नेमकं कोण आहोत ?याचा शोध आपल्याला हे पुस्तक घेण्यास भाग पाडते. नोकरी-व्यवसायात तर आयुष्यात सुद्धा अनेक बदल घडत असतात, हे सत्य आपण सर्वजण मान्य करतो.पण या होणाऱ्या बदलांशी आपण किती जण जुडवून घेतो?आपल्या पैकी खूपच कमी लोकं आयुष्यात बदल घडायला हवेत अशी,अपेक्षा करतात.अन्यथा जसं सुरू आहे तसंच कायम स्वरूपी सुरू राहावं असं आपल्याला वाटतं असते.खूपच कमी लोकं आपला कंफर्ट झोन सोडून बाहेर पडतात.आयुष्यात नेहमी काही बदल अचानक घडतात त्यासाठी आपण नेहमी तयार असतोच असे नाही.त्यामुळे अनेकांची यामध्ये गोची होते.त्यांना काही मार...

प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स...❤️

इमेज
Nothing Is Impossible✊ काही दिवसांपूर्वी हे प्रेरणादायी आणि खूप काही शिकवून जाणारं पुस्तक वाचलं.नुसतं वाचलं नाही तर अनुभवलं,समजून घेतलं..सहाणे कुटुंबाच्या प्रवासात सहभागी  झाल्याचा,त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास फार जवळून बघून आल्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचून आला..या पुस्तकाच्या प्रवासात कळत/नकळत खूप काही जीवनोपयोगी धडे शिकायला मिळाले. आयुष्यात काहीही झालं,कितीही संकटे आली तरीही हार मानायची नाही. त्या आलेल्या संकटांना कडाडीची झुंज देत मार्गक्रमण करत राहायचं ही महत्त्वाची शिकवण या पुस्तकाने मला दिली..कितीतरी वेळा निशब्द करून जाणाऱ्या या आत्मचरित्राने मला दुःखासोबत लढायची हिम्मत दिली. आयुष्यातील समस्येशी मैत्री करायची महत्वपूर्ण गोष्ट मला या पुस्तकाने सांगितली.यासोबतच आयुष्यातील प्रत्येक क्षण कसा जगायचं याबद्दल कमालीचं मार्गदर्शन सुद्धा केलं.अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने उंच भरारी घेण्याची जिद्द जागृत या पुस्तकाने केली.  आपण हे करू शकत नाही किंवा आपल्याला हे जमणार नाही असा विचार सुद्धा आता कधी हे पुस्तक वाचल्यानंतर मला येणार नाही एवढं नक्की. कारण प्रेरणा ताई सारख्या खऱ्या अर्थ...

गंगेत गगन वितळले ❤️

इमेज
काही दिवसांपूर्वी पुस्तके खरेदी करत असताना मला राजहंस प्रकाशनाच्या वेबसाईटवर हे पुस्तक दिसलं.मुखपृष्ठावर बापुचा फोटो असल्याने कुठलाही विचार न करता. सरळ सरळ हे पुस्तक खरेदी केले होते..काही दिवसांपूर्वी हे पुस्तक वाचलं त्यावर विचार करून पुस्तक ठेऊन दिलं कारण याबद्दल लिहायला माझी मनस्थिती तेव्हा हवी तशी नव्हती..म्हणून म्हटलं आज काहीतरी याबद्दल लिहावं इतरांना सुद्धा कल्पना द्यावी या पुस्तकांबद्दल...  मागे मधूश्री प्रकाशनकडून प्रकाशित झालेलं आंबेडकर -अनुयायांच्या नजरेतून हे पुस्तक वाचण्यात आलं होतं.त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्या नजरेतून बघितलेले बाबासाहेब आपल्यापुढे मांडले होते.बाबासाहेबांच्या आयुष्यातील किस्से त्यांनी या पुस्तकात खूपच उत्कृष्ट पद्धतीने मांडलेले आहेत अशाच प्रकारचं हे एक पुस्तक"गंगेमध्ये गगन वितळले "अंबरीश मिश्र सरांनी लिहलं आहे.या पुस्तकांमध्ये महादेवभाई देसाई , जमनालाल बजाज , मनुबेन गांधी , हरिलाल गांधी ... या आणि अशाच काही जिवलग सहकाऱ्यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळेच  गांधीजी रेखांकित होतात.. माणसं जोडण्याची अपूर्...

बाबासाहेब आणि मी ❤️

इमेज
लहानपनापासूनच या माणसाचे विशेषकरून बौद्धमित्रांच्या घरात,चित्रपटातील कोर्टात- पोलिस ठाण्यात फोटो बघायचो.गावातील चौकात असलेला यांचा पुतळा नेहमीच बघायचो.गावातील जयंतीत सुद्धा नेहमी यांचा फोटो हमखास दरवर्षी नजरेत पडायचा.दरवर्षी 14 एप्रिल जयंतीच्या दिवशी आमच्या पूर्ण बौद्ध वाड्यात प्रत्येकांचे घरी निळे व पंचशील झेंडे लावलेले असायचे.वर्षभर जुने,फाटके कपडे घालणारे माझे मित्र नवीन कपडे ,बुट घालून जयंतीत नाचायचे.आनंद साजरा करायचे.त्यांना बघून खरंच मला खूप आनंद व्हायचा. मी नेहमी हाच विचार करायचो की हा चष्मा,सुटबुट घातलेला आणि हातात नेहमी एक जाड पुस्तक घेऊन उभा असलेला हा माणूस आहे तरी कोण ?? या माणसाने नेमकं केलं तरी काय ?? की प्रत्येक गावात यांचा एक तरी पुतळा आहेच .. नंतर मला वाटले की हे बौद्ध बांधवांचे एक देव आहेत आणि यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे.मग समजलं की ते एक डॉक्टर होते त्यांनी गरिबांचे मोफत इलाज करून अनेकांचे प्राण वाचवले म्हणून त्यांना लोकं देव मानतात. त्यानंतर मला समजले की हे देव नसून एक मोठे नेते आहेत आणि हे फक्त बौद्ध बांधवांचेच आहे. कारण बौद्ध मित्रांच्या घरातच य...

वाचणाऱ्याची रोजनिशी ❤️

इमेज
सतिश काळसेकर सर लिखित वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तकावरील पुस्तके (Books on Books) या प्रकारात मोडणारं पुस्तक आज दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केलं.काही पुस्तके अशी असतात जी एकदा वाचून मन भरत नाही तर ती परत परत वाचावी लागतात.त्या पुस्तकाच्या यादीत हे पुस्तक मला आवर्जून ऍड करावं वाटतं.सतीश काळसेकर हा उमदा व्यक्तिमत्त्व, कमालीचा लेखक आणि तेवढ्याच ताकदीचा वाचक मागच्या वर्षी आपल्याला सोडून गेला .या माणसाच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.जी कधीही भरून येणारी नाही.सतीश सर जरी आपल्याला सोडून गेले असतील पण तरी त्यांच्या साहित्यरूपी ते आपल्या हृदयात कायम राहतील एवढं नक्की.मला या पुस्तकाबद्दल त्यांना अभिप्राय द्यायची फार इच्छा होती.माझा अनुभव शेअर करायला खूप आवडलं असतं पण नियतीला हे मान्य नव्हतं.अभिप्राय कळवण्याआधीच ते गेले या गोष्टीचं दुःख कायम मनात सलत राहणार.आणि त्यांचं वाचन,पुस्तक प्रेम मला नेहमी सतत प्रेरणा देत राहणार आहे. 2013 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हे पुस्तक वाचून प्रचंड आनंद झाला.लेखकांचा पुस्तक आणि वाचन वेड बघून भारावून गेलो.खूप काही नवीन आणि महत्वपूर्ण या पु...

अर्थसाक्षर व्हा ! ❤️

इमेज
काही दिवसांपूर्वी अभिजित कोळपकर (सीए) लिखित अर्थसाक्षर व्हा हे फार महत्वपूर्ण आणि आजच्या काळात फार गरजेचं असलेलं मराठी पुस्तक वाचलं.मनातील असंख्य Doubts,संभ्रम तर दूर झालेच त्यासोबत कमालीचं मार्गदर्शन सुद्धा मिळालं.या पुस्तकात अगदी सोप्या आणि साध्या भाषेत अर्थजतन व अर्थसंवर्धन वाचकाला समजावले आहे.एकूण 389 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात आपल्याला अर्थसाक्षरते संबंधित असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात.एकंदरीत हे पुस्तक आपल्याला बोट धरून मार्गदर्शन करायचं काम करते.काय करावे यासोबतच काय करू नये हे सुद्धा समजावून सांगते.फायद्या सोबत होणाऱ्या तोट्याची सुद्धा पूर्वकल्पना हे पुस्तक आपल्याला देते. लेखक म्हणतात :-  अर्थसाक्षर व्हा ! हे केवळ आर्थिक नियोजनावर आधारित अनेक पुस्तकांपैकी एक पुस्तक नाही. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे अगदी सर्वसामान्य वाचक, युवा, तसेच ज्येष्ठ नागरिक या साऱ्यांचा, वैयक्तिक व कौटुंबिक दृष्टिकोनाचा विचार करून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.एकूण ६ भागांमध्ये हे पुस्तक विभागण्यात आले असून यामध्ये 1)ओळख अर्थसाक्षरतेची, 2) आर्थिक नियोजन 3)विमा व कर्ज व्यवस्थापन 4)गुं...

वाचन माझी आवड ❤️

इमेज
वाचन माझा सर्वांत आवडता छंद आहे.माझी आवड आहे. ते कोणीही माझ्यावर लादलेलं नाही.माझ्या पुस्तकांवर माझा खूप प्रेम आहे.मी मुक्तपणे, मनाला वाटेल ते आणि तसे वाचन करत असतो.यामध्ये वाचन,पुस्तक संग्रह आणि लिखानासंबंधीत मला इतरांचे सल्ले अजिबात आवडत नाही.मला स्वतःच्या मर्जीने वाट्टेल ते वाचायला आवडतं.मग ते कोणालाही पटणारं नसेल तरी चालेल. प्रेशर वगैरे घेऊन मला वाचन करावं असं अजिबात वाटतं नाही.मनसोक्तपणे बिंदास ,आपल्या आवडीने वाचन करायला मी प्राधान्य देत असतो.कारण यामध्ये माझी कोणासोबतही स्पर्धा नाही.हजारो पुस्तके वाचून संपवणे हा माझा लक्ष्य नाही.मला चांगली पुस्तके वाचायची आहेच पण ती प्रत्यक्षात जगायची सुद्धा आहे.हजारो, लाखो पुस्तके संग्रही करायची आहे.होय मला ठाऊक आहे की मी सर्वच वाचून पूर्ण करू शकणार नाही.पण मला माझ्या येणाऱ्या पिढीला ही संपत्ती द्यायची आहे. वाचनाने होणारे असंख्य फायदे Automatically मला जाणवत आहेत आणि पुढे सुद्धा जाणवत राहतील. वाचनाला एखाद्या स्पर्धेचा रूप मला द्यावं वाटतं नाही.हे वाच,हे वाचू नको, असे वाच,असे लिही,वाचलेल्या नोट्स काढाव्या का ,कोणती पुस्तके वाचावी,वाचल...

देवदासी आणि नग्नपूजा

इमेज
उत्तम कांबळे लिखित हे 120 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक काल रात्री वाचून समाप्त केलं.. एकंदरीत खूप कठीण गेलं हे पुस्तक वाचायला.कारण वाचताना अनेक वेळा एकंदरीत सुन्न व्हायला होतं.देवदासी प्रथेचा इतिहास, देवदासी प्रथेचे स्वरूप,पद्धत आणि लेखकाचे नग्न पूजेचे प्रत्यक्ष बघितलेल्या अनुभवाचे वर्णन वाचून कमालीचं अस्वस्थ व्हायला होतं. वाचताना विचारांच्या चक्रात गुंतून डोकं हँग होतं.वाचत असताना कितीतरी वेळा किळस येते तर अनेक वेळा आपसूकच डोळे पाणावतात. देव, धर्माच्या नावाखाली हे असले कृत्य लोकं खपवतातच कसे ?हा प्रश्न मनाला भेडसावतो.अंधश्रद्धेच्या आहारी लोकं किती खालच्या पातळीवर जातात ते हे पुस्तक वाचून लक्षात येतं.या पुस्तकाची पहिली आवृत्ती जरी 1988 साली आली असली तरीही तेव्हा आणि आता सुद्धा या प्रथेत पडायला हवा तेवढा काही फरक पडलेला हे पुस्तक वाचत असताना जाणवत नाही.या प्रथेविरुद्ध किती आणि कसं कार्य झालं ?कितीप्रमाणात जनजागृती झाली ? कोणकोणते कायदे या विरोधात तयार झाले ?इत्यादी प्रश्नांची उत्तरे बरीच प्रमाणात निराशाजनक आहे.जातीयवाद ज्याप्रकारे पूर्णपणे संपला असे आपण म्हणू शकत नाही ठीक त्याचप्रमाणे देवद...

मनातलं काही....❤️

इमेज
अश्या असंख्य गोष्टी आहेत ज्या मला शिकायच्या आहेत.मला खुप काही शिकायला,करायला आवडतं. पण सुरुवातीपासून गावातच राहिल्याने या गोष्टींवर काही मर्यादा आल्या.खूप काही करायचं, शिकायचं होतं आणि आहे.but काही कारणाने ते करू शकलो नाही.पण आता ते भविष्यात करायचं आहे.असंख्य गोष्टीबद्दल खूप उशिरा कळालं त्याबद्दल अनेक वेळा खूप दुःख होतो.आता जे मार्गदर्शन करणारे,मार्ग दाखवणारे पूर्वी मिळाले असते तर आयुष्य फार नाही But थोडं वेगळ्या वळणांवर असलं असतं. Its ok जे झालं ते झालं.माझी माझ्या आयुष्याबद्दल अजिबात तक्रार नाही. मला आजपर्यंत जे काही मिळालं ते असंख्य जणांच आजसुद्धा स्वप्न आहे.मी संघर्ष केला नाही आजपर्यंत.पण मला तो करायचं आहे. मी संघर्ष/Struggle साठी पूर्णपणे तयार आहे.बापाच्या पैशांवर मला जगायचं नाही.जे काही करायचं आहे ते स्वतःच.एक छोटीशी झोपडी असेल ती स्वतःची आणि सेल्फ made असेल एवढं नक्की..आजपर्यंत कम्फर्टझोन मध्ये जगलोय तो कम्फर्ट झोन सोडायचं प्रयत्न करतोय पण तो कधी कधी जमतं नाही.स्वतःशी रोज लढतोय. कधी जिंकतोय तर कधी हरतोय..अभ्यास,वाचन वगैरे न चुकता करतोय.दिनक्रम बदललं आहे.आयुष्याची वाट...

एम टी आयवा मारू ❤️

इमेज
मी वाचलेली मला प्रचंड आवडलेली एक अप्रतिम कादंबरी. जी वाचत असताना मी पूर्णपणे त्यामध्ये हरवून गेलो होतो.सहज वाचता वाचता कधी वाचून पूर्ण झाली हे मला स्वतःसुद्धा कळालं नाही..एकंदरीत तुम्ही जर एखाद्या हटके,भन्नाट, रोमांचक आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या मराठी कादंबरीच्या शोधात असाल तर ही कादंबरी नक्की वाचावी.एक वेगळाच नशा आणि हँगओव्हर ही कादंबरी वाचताना वाचकांवर चढतो जो कितीतरी दिवस उतरत नाही.पहिल्या पेज पासून शेवटच्या पेजपर्यत वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहे.एकदा वाचन सुरू केल्यावर वाचून पूर्ण केल्याशिवाय ठेऊच शकत नाही असा या कादंबरीचा कथानक आहे.अनंत सरांची लेखन शैली म्हणजे अफलातून आणि बिंदास्त अशी आहे.लेखकांची ही पहिलीच कादंबरी आहे असं वाचताना कोठेही वाटतं नाही.1989 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीची मोहिनी वाचकांना भुरळ पाडते.385 पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी वाचताना वाचकाला कोठेही थोडं सुद्धा कंटाळा येऊ देत नाही.लेखक स्वतः नाविक असल्याने  लेखनातील जहाजावरील तांत्रिक बाजू त्यांनी योग्य पध्दतीने सांभाळली आहे. समुद्र,जहाज आणि जहाजावरील एका वेगळ्याच विश्वाची ...

सिद्धार्थ ❤️

इमेज
या बौद्ध पौर्णिमेला विशेष करून नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक हरमान हेसे यांची जागतिक पातळीवर गाजलेल्या "सिध्दार्थ" या कादंबरीचा अनुवाद दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केला.1922 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाले आहेत.आणि यामुळे विशेष ही कादंबरी मी यावर्षी दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केली..एकंदरीत मला ही कादंबरी खूप आवडली आणि भावली..दुसऱ्या वाचनात काही नवीन आयाम समजले,उमजले.खूप काही नव्याने शिकवलं या कादंबरीने.मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मला या कादंबरीत मिळाली.स्व:अध्ययन करण्यासाठी विशेष प्रेरणा मिळाली.. कादंबरीचे नाव जरी 'सिद्धार्थ' असले तरी ही कादंबरी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याबद्दल नाही.या कादंबरीत गौतम बुद्धाच्या समकालातील एका मनस्वी भारतीयाचा आत्मरूपाचा शोध घेण्यात आला आहे. कादंबरीचा काळ हा मात्र गौतम बुद्धाच्या समकालीन आहे.आणि यामध्ये बुद्ध आणि धम्माचा उल्लेख आलेला आहे.एकंदरीत हरमान हेसे यांनी गौतम बुद्धांच्या कथेची वेगळ्या प्रकारे पुनरावृत्ती केली आहे, परंतु त्याच परिमाणात, त्याच अर्थाने.. या कादंबरीचा मुख्य नायक सिद्धार्थ याच...

माझा रशियाचा प्रवास ❤️

इमेज
अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेलं सर्वकाही मला वाचायचं आहे.मी आजपर्यंत जरी अण्णाभाऊ यांच विशेष असं काही अपवाद वगळता वाचलेलं नसलं तरीही आतापर्यंत जे काही वाचलंय त्यावरून अण्णा माझ्या आवडीच्या व्यक्तिमत्त्व आणि लेखकाच्या यादीत नेहमी अग्रणी आहेत आणि असतील .फक्त दिढ दिवसाची शाळा शिकून मराठी साहित्याला महत्वपूर्ण साहित्य देणारा हा साहित्यकार,शाहिर मला फार आदरणीय वाटतो नेहमीच.लवकरच त्यांचा समग्र साहित्य संग्रही करून मला वाचून काढायचं आहे.फकिरा ही अण्णांची मी वाचलेली व मला आवडलेली कादंबरी जी आजपर्यंत किमान 4 वेळा वाचून काढली आहे.ही कादंबरी वाचून व अण्णांबद्दल इतर काही वाचून तर मी या कायम उपेक्षित राहिलेल्या अवलियाच्या अजून कितीतरी प्रेमात पडलोय. अण्णाभाऊ 1961 साली रशियाला गेले होते. त्यांनी या आपल्या प्रवासावर एक प्रवासवर्णनपर पुस्तक लिहलेलं आहे.याबद्दल मी सुरुवातीला वाचलं होतं.तेव्हापासून मला हे पुस्तक वाचण्याची जाम इच्छा होती.म्हणून मी हे पुस्तक काही ठिकाणी खूप शोधलं पण मला काही ते मिळालं नाही.आता अण्णांच्या समग्र साहित्यातच आपल्याला ते वाचायला मिळेल हा विचार करून मी मागे हे पुस्तक मि...