पोस्ट्स

वाचन प्रवास....🌼❤️

इमेज
माझ्या आयुष्याचा खरा अभ्यासाचा प्रवास हा 7 वीच्या दुसऱ्या सत्रापासून सुरू झाला. त्याआधीपर्यंत माझं आयुष्य खरं सांगायचं तर काळोखात हरवल्यासारखं होतं. शाळेचं नाव जरी काढलं तरी माझ्या अंगावर काटा यायचा. अभ्यास करणं, पुस्तक वाचणं हा तर अगदी लांबचा विषय होता. पाचवीपासून जवळपास अडीच वर्षं मी अक्षरशः न्यूनगंडात अडकलो होतो. त्या काळात मी फक्त वेळ वाया घालवला जुगार खेळणं, गावच्या नदीवर किंवा शेतात दिवसभर बसणं, निरर्थक फिरणं. माझ्या आयुष्याची गाडी अक्षरशः रुळावरून घसरलेलीच होती. पण प्रत्येकाच्या आयुष्यात जसा एखादा लाईफ-चेंजिंग प्रसंग येतो तसाच माझ्याही आयुष्यात आला. तो म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत मी जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट माझं आयुष्य बदलून गेला. त्या आधीपर्यंत माझ्या गावात, समाजात ऐकून माझ्या मनात बाबासाहेब म्हणजे फक्त बुद्ध धर्माचे नेते, “जय भीम” म्हणणाऱ्यांपुरते मर्यादित व्यक्ती असं एक गैरसमजाचं चित्र होतं. पण जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा पहिल्यांदा मला बाबासाहेबांचं खरं अफाट व्यक्तिमत्त्व दिसलं. त्यांचा संघर्ष, त्यांचं कष्टाळ...

या जागा राखीव आहेत...🌸❤️

इमेज
आज कॉलेजमध्ये Parliamentarians’ Club ने Does Reservation weaken or redefine merit? या विषयावर चर्चा घडवून आणली.  विद्यार्थ्यांनी आपापली मतं मांडली, वाद–प्रतिवाद झाले. मी माझा एक छोटासा view मांडला नि त्यासाठी मी नेहमी सोबत ठेवत असलेल्या अभिनव चंद्रचूड यांच्या “या जागा राखीव आहेत” या पुस्तकाचा आधार घेतला नि इतराना आवर्जून वाचायचं सुद्धा सांगितलं…❤️ हल्ली मी याबद्दल बऱ्याचदा वाचतोय, म्हणूनच मला हे पुस्तक सुचवावसं वाटतं. या पुस्तकात स्पष्ट सांगितलं आहे की merit म्हणजे फक्त marks किंवा exams नाहीत माणसाला आयुष्यात संधी मिळाल्या का नाहीत, हेही merit चाच भाग आहे. सुरुवातीलाच line unequal असेल, तर Result सारखे कसे असतील? आरक्षण म्हणजे कुणाला gift देणं नाही तर समान पातळीवर आणणं आहे. त्यामुळे reservation weaken करत नाही उलट redefine करतं हा मुद्दा समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं..❤️

प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति…..❤️

इमेज
ओशो यांना वाचल्यानंतर काही दिवसांपुर्वी जे. कृष्णमूर्ती यांच्याकडे वळलोय.आधी यूट्यूब नि गुगल वर काही बघून ,वाचून त्यांच्या ‘The First And Last Freedom’या पुस्तकाचा मराठी अनुवाद , ‘प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति’ हे वाचायला घेतलं नि कधी वाचून पूर्ण केलं समजलं सुद्धा नाही .🌱 हे पुस्तक वाचताना मला कायम जाणवत राहिलं की आयुष्यात खरी मोकळीक, मनःशांती नि आनंद मिळवण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. कृष्णमूर्ती खूप स्पष्टपणे सांगतात, की आपली सुख-दुःख, समस्या, गोंधळ हे सगळं बाहेरच्या गोष्टींमुळे किंवा नियतीमुळे घडत नसतं तर ते आपल्याच मनाच्या विचाराच्या अन् जुन्या सवयींच्या साखळीत अडकलेलं असतं. हे पुस्तक वाचताना प्रकर्षानं जाणवतं की खरी “मुक्ती” म्हणजे स्वातंत्र्य, ही धर्म, प्रथा, शिकवणी किंवा कुठल्या आदर्शाच्या मागे धावून मिळत नाही तर ती आपल्याला स्वत:च्या मनाचा, विचारांचा नि कृतींचा तल्लखपणे शोध घ्यावा लागतो असे कृष्णमूर्ती यात समजावतात. या पुस्तकात सुरुवातीला कृष्णमूर्तींनी अनेक दैनंदिन प्रश्न कंटाळा, भीती, दुःख, ईश्वर, आत्मज्ञान अगदी सरळ भाषेत सांगितले आहेत. ...

बुद्ध चरित्र…🩷

इमेज
हे पुस्तक धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेलं आहे. यात गौतम बुद्ध यांचं जीवन अगदी सोप्या नि समजण्यास सोप्या भाषेत सांगितलंय. बुद्धांचा जन्म राजघराण्यात झाला पण त्यांना लहानपणापासूनच जगातील दुःख नि वेदना समजायला लागल्या. त्यांनी सुखी आयुष्य सोडून सत्याचा शोध घेतला. धूप, उपवास, कठोर तपश्चर्या करूनही त्यांना समाधान मिळालं नाही. शेवटी त्यांनी एका झाडाखाली ध्यान करून जीवनातलं खऱं ज्ञान मिळवलं, ज्यामुळे त्या वेदना दूर होतील, हा मार्ग समजला. बुद्धांनी लोकांना अहिंसा, करुणा नि समतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं की माणसाला स्वतःच्या मनाला समजून घेतलं पाहिजे व इतरांशी प्रेमाने वागलं पाहिजे. हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्त्वाचं आहे. आपण सुखी होण्यासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता, मन शांत ठेवावं, साधं जगावं अन् चांगुलपणा जगात पसरवावा असं हे पुस्तक शिकवतं.  या पुस्तकामुळे वाचकाला स्वतःच्या आयुष्याबद्दल खोल विचार करता येतो नि जगण्याचा अधिक अर्थ समजतो. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने नक्की वाचावं.💙 ©️Moin's Shelf🌿🩵

तर सर्वप्रथम We Read मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे....🌼❤️

इमेज
तर सर्वप्रथम We Read मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे....🌼❤️ "पुस्तकं ही माणसाची खरी मित्र असतात," असं आपण नेहमीच ऐकत आलोय. पण ही मैत्री जपण्यासाठी नि टिकवण्यासाठी ही पुस्तकं सहज उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून आपण We Read ही वाचन चळवळ सुरू केली आहे. मी Moin Humanist, बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर गावचा एक सामान्य वाचक जो वाचतो,वाचल्यानंतर पुस्तकाबद्दल लिहितो नि ती पुस्तके माझ्यासारख्या वाचकांपर्यंत सवलतीत घरपोच पोहोचवतो सुद्धा माझ्या वाचनप्रेमाला बघून शरद तांदळे सरांनी मला 2022 साली एका वाचकाला दिला जाणारा पहिला 'स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार' दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात मी Study Bunker नावाचा एक छोटासा उपक्रम सुरू केला ही अशी एक जागा आहे जिथे कुणीही वाचक मोफत येऊन पुस्तके वाचू शकतो.याची दखल BBC मराठीने सुद्धा घेतली आहे जी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. हळूहळू ही जागा वाचकांचं केंद्र बनत गेली. याच स्टडी बंकरमधून ‘We Read’ ही कल्पना आकारास आली.केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता, वाचनसंस्कृती पोसणारी नि ती पुढे नेणा...

शहीद भगतसिंहांची जेल डायरी…🩷🌱

इमेज
हे पुस्तक वाचताना असं जाणवतं की आपण फक्त तुरुंगातल्या कैद्याची नोंद वाचत नाही तर एका विचारवंताचा मेंदू, त्याची स्वप्नं, त्याची जिद्द नि त्याच्यातून उमलणारी क्रांती यांना जवळून अनुभवतोय . या डायरीतून कळतं की भगतसिंह हे केवळ बंदुकीवर विश्वास ठेवणारे क्रांतिकारक नव्हते तर ते प्रखर वाचन करणारे, प्रश्न विचारणारे नि समाजाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहणारे तत्त्वज्ञ होते. तुरुंगातल्या 713 दिवसांत त्यांनी तब्बल 302 ग्रंथ वाचले, 5 पुस्तकं लिहिली नि 116 दिवसांच्या उपोषणानंतर ही 404 पानांची डायरी लिहायला सुरुवात केली. जरी आज आपल्या हातात फक्त 137 पाने उपलब्ध असली तरीही त्या प्रत्येक पानात विचारांची संपत्ती आहे.  यात इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य अशा अनेक विषयांवर सखोल चिंतन आहे. भगतसिंहांनी धर्म, जात, विषमता, न्यायव्यवस्था अन् स्वातंत्र्य यावर जे विचार लिहिले ते आजच्या काळातही तितकेच लागू पडतात. प्रत्येक पान वाचताना असं वाटतं की ते थेट आपल्या मनाशी बोलत आहेत नि आपल्याला जागं करत आहेत.  आपल्यापैकी अनेकांनी भगतसिंहांना फक्त शौर्यवान क्रांतिकारक म्हणून प...

उष्टं…❤️

इमेज
मागे ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जुठन’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद ‘उष्टं’ वाचून पूर्ण केलं. मराठीतील उपरा, बलूतं, उचल्या, अक्करमाशी, भंगार, कोल्हाट्याचं पोरं या धाटणीतील दलित साहित्याच्या परंपरेत बसणारं हे पुस्तक प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचलंच पाहिजे. हे फक्त आत्मचरित्र नाही तर हा समाजाच्या अंतर्मनात लपलेल्या कुरूपतेचा आरसा आहे. भंगी समाजात जन्मलेले वाल्मिकी यांनी पावलोपावली अनुभवलेली हीन वागणूक, उपेक्षा, जातीयभेदाचे जळजळीत चटके, असमानता नि दारिद्र्याचे अनुभव ते निःसंकोचपणे मांडतात. वाचताना मन सुन्न होतं, डोळे पाणावतात नि आपण अजूनही बदलाची गरज आहे हे नाकारता येत नाही. या पुस्तकाची ओळख मला पहिल्यांदा NCERT च्या एका धड्यातून झाली. तिथला एक छोटा प्रसंग वाचूनच पोटात गोळा आला होता नि तेव्हाच ठरवलं की हे पुस्तक पूर्ण वाचायचंच. हिंदी मूळ वाचण्याऐवजी 2018 साली लोकवाङ्मय गृहकडून आलेला डॉ. मंगेश बनसोड यांचा मराठी अनुवाद बोलावला नि पहिल्या पानापासूनच ते डोक्यात नि हृदयात उतरलं. वाल्मिकी यांचं बालपण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका लहान गावात गावकुसाच्या बाहेर, नाल्याजवळील भ...