पोस्ट्स

टू किल अ मॉकिंगबर्ड 🕊️🌸

इमेज
तर नुकतीच मी हार्पर ली यांची ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचून पूर्ण केली. 1960 मध्ये प्रकाशित झालेल्या अन् पुलित्झर पुरस्कार प्राप्त या कादंबरीच्या जगभरात कोट्यवधी प्रती विकल्या गेल्या आहेत. पण ही कादंबरी हातातून खाली ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, या कादंबरीची खरी ओळख त्याच्या प्रचंड खपात किंवा लोकप्रियतेत नाहीच , तर ते वाचताना नि वाचून झाल्यानंतरही आपल्या मनात जी एक तीव्र अस्वस्थता रेंगाळत राहते, त्यात आहे.☘️ वरवर पाहता, ही कथा अलाबामा राज्यातील 'मेयकॉम्ब' या एका लहानशा शांत शहरात राहणाऱ्या 'स्काउट' नावाच्या चिमुकल्या मुलीची, तिचा भाऊ जॅम आणि तिचे वकील वडील एटिकस फिंच यांची वाटते.  लहान मुलांचे खेळ, त्यांचे बालसुलभ कुतूहल नि आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा त्यांचा निष्पाप दृष्टिकोन यातून कथेची सुरुवात होते. पण हळूहळू ही कथा आपल्याला एका अशा अंधाऱ्या वळणावर घेऊन जाते, जिथे अमेरिकेचा प्रदीर्घ नि कलंकित वर्णद्वेषाचा इतिहास जसाच्या तसा उघडा पडतो. यातील कथानकाचा मुख्य गाभा नेमकं काय आहे ? तर टॉम रॉबिन्सन या एका कृष्णवर्णीय तरुणावर एका गोऱ्या महिलेने केलेला बलात्कारा...

गंगथडी……❤️

इमेज
नारायण खानसोळे सर लिखित नुकतीचं आलेली नवी-कोरी 256 पृष्ठसंख्या असलेली कादंबरी वाचली नि भरून पावलो असं म्हणू शकतो कारण मी ही कादंबरी वाचली नाही तर अक्षरशः जगून आलोय. काही पुस्तकं वाचताना माणूस पानांमध्ये हरवत नाही तर तो मातीत हरवतो. गोदाकाठच्या त्या ओल्या मातीत, बाभुळबनाच्या दाटवाटात, पुराच्या दरडीखाली वसलेल्या वासरी गावाच्या गल्ल्यांमध्ये.  नारायण खानसोळे सरांची नवी कोरी कादंबरी गंगथडी वाचताना हेच होतं. ही एका गावाची कथा तर आहेच त्यासोबतच ही एका संपूर्ण कृषी संस्कृतीची जिवंत स्मृती सुद्धा आहे नि ती स्मृती इतकी खरी आहे, इतकी अस्सल आहे की वाचता वाचता आपल्याला आपल्या आजोळच्या रानाचा वास यावा, आजीच्या हातच्या भाकरीची आठवण यावी, गुरांच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज कानात घुमावा. गंगथडी म्हणजे गोदाकाठची जीवनरीत. गोदावरी आईच्या काठावर, नांदेडच्या खालून, काळ्या मातीच्या वावरांमध्ये जगणाऱ्या माणसांची ही कथा आहे. पण लेखक फक्त माणसांबद्दल लिहित नाहीत ते त्या झाडांबद्दल लिहितात, त्या दरडींबद्दल लिहितात, त्या गंगेच्या पाण्याबद्दल लिहितात जी लेकरं, पाखरं, वासरं, किडे-मुंग्यांची माय आहे.  ...

उद्योजकतेतील पहिले पाऊल…..❤️🌸

इमेज
उद्योजकतेतील पहिले पाऊल…..❤️🌸 काही दिवसापूर्वी अखेर हे 175 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवलं नि वाचून संपवल्यावर मनात पहिल्यांदा जी जाणीव दाटून आली, ती म्हणजे उद्योजकता ही काही फक्त दुकान, फॅक्टरी, भांडवल किंवा मोठ्या बोर्डावर झळकणाऱ्या नावाची गोष्ट नाही. तर उद्योजकता ही आधी मनात जन्म घेते. माणसाच्या विचारांत, त्याच्या जिद्दीत, त्याच्या पाहण्यात नि त्याच्या जगण्याच्या रितीत ती आकाराला येते.  प्रशांत पवार यांनी लिहिलेलं हे पुस्तक नेमकं हीच गोष्ट सांगतं. म्हणूनच हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की एखादा माणूस आपल्याशी गप्पा मारतोय, हात धरून चालवत आहे नि म्हणतोय की अरे, व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी स्वतःला उभं कर. या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा दृष्टिकोन. तो दृष्टिकोन फक्त तांत्रिक नाही, फक्त आकड्यांचा नाही किंवा नफ्या-तोट्याचा नाही तर तो माणसाच्या जडणघडणीचा आहे.  उद्योजक व्हायचं म्हणजे आधी विचार करायला शिकायचं असतं संकटांना घाबरायचं नसतं , संधी ओळखायची असते नि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा असतो. अन् हे सगळं या पुस्तकात जागोजागी येतं. म...

हमारी अधुरी कहाणी - 2(Part -1)🥰♥️

इमेज
काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात… ❤️ प्रेम नेमकं कधी होतं? पहिल्याच नजरेत? की अनेक भेटीनंतर? की एखाद्या साध्या कशी आहेस? मध्ये? मला आजही त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. पण एवढं नक्की माहीत आहे, की काही माणसं आपल्या आयुष्यात इतक्या शांतपणे येतात की ते कधी आपल्या श्वासाचा भाग बनतात हे कळतच नाही. नि जेव्हा ते निघून जातात, तेव्हा लक्षात येतं की ते फक्त आयुष्यात आले नव्हते तर आपल्या आयुष्याचा एक भाग बनून गेले होते. माझ्यासाठीही ते सगळं अगदी असंच सुरू झालं.🌸 मी पहिल्यांदाच घरापासून इतक्या लांब आलो होतो. एका छोट्याशा गावातून मोठ्या कॉलेजमध्ये. मनात अनेक स्वप्नं होती, पण त्याहून जास्त भीती होती. नवीन शहर, नवीन माणसं, नवीन वातावरण… नि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाषा.  आजूबाजूला सगळे सहज इंग्रजीत बोलत होते. काहीजण हिंदीतही बोलत होते. मी मात्र दोन्ही भाषांमध्ये स्वतःला अपुरा समजत होतो. वर्गात बसायचो, लोकांशी हसायचो पण आतून कुठेतरी एकटाच होतो.  माणसांनी भरलेल्या गर्दीतही एकटेपणा किती मोठा असतो, हे मला त्या दिवसांत समजलं. अशातच काही दिवसांनंतर एक दिवस ती भेटली. ती आमची अग...

Moin's 400 पुस्तकांची यादी पार्ट -1 ♥️🌼

इमेज
मी वाचलेली नि माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकांपैकी 400 पुस्तकांची यादी शेअर करतोय...♥️🌼 भाग:1 😊❤️ 1. भारताचा शोध — पंडित जवाहरलाल नेहरू 2. नास्तिकयात्रा — सुनील दांडेकर 3. द अलकेमिस्ट — पाउलो कोएलो 4. चकवा चांदण — मारुती चितमपल्ली 5. कोल्हाट्याचं पोरं — किशोर काळे 6. असुरवेद — संजय सोनवानी 7. अर्ली इंडियन्स — टोनी जोसेफ 8. पृथ्वीवर माणूस उपराच 9. प्रोपगंडा — रवि आमले 10. निशाणी डावा अंगठा — रमेश इंगळे 11. डोंगरी ते दुबई — एस. हुसेन जैदी 12. इजिप्तायन — मीना प्रभू 13. एका तेलियाने — गिरीश कुबेर 14. हा तेल नावाचा इतिहास आहे — गिरीश कुबेर 15. टाटायन — गिरीश कुबेर 16. त्याने गांधीला का मारले 17. माझे सत्याचे प्रयोग — महात्मा गांधी 18. माणूस असा का वागतो? — अंजली चिपलकट्टी 19. श्यामची आई — साने गुरुजी 20. युगंधर — शिवाजी सावंत 21. पानिपत — विश्वास पाटील 22. स्वामी — रणजित देसाई 23. ययाती — वि. स. खांडेकर 24. कोसला — भालचंद्र नेमाडे 25. शाळा — मिलिंद बोकील 26. एक होता कार्व्हर — वीणा गवाणकर 27. व्यक्ती आणि वल्ली — पु. ल. देशपांडे 28. बटाट्याची चाळ — पु. ल. देशपांडे 29. नटसम्राट...

महामाया निळावंती…🌸❤️

या कादंबरीचं केंद्रस्थान आहे ‘निळावंती’ची ती प्राचीन आख्यायिका. असं म्हणतात की, निळावंती हा असा एक ग्रंथ आहे जो वाचणाऱ्याला निसर्गाची भाषा समजते, प्राण्यांशी संवाद साधता येतो, पण तो ग्रंथ वाचणारा एकतर वेडा होतो किंवा त्याचा अंत होतो.  या आख्यायिकेभोवती सुमेध दादा यांनी विणलेलं जाळं थक्क करणारं आहे.  कथानकात येतो तो विक्रम विभूते एक वैज्ञानिक, ज्याचा तर्कशास्त्रावर विश्वास आहे. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात एक न भरून येणारं दुःख येतं, जेव्हा तो आपल्या मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपडू लागतो, तेव्हा विज्ञानाची चौकट मोडली जाते. विज्ञानाने नाकारलेल्या गोष्टी जेव्हा मानवी भावनेच्या नि हट्टाच्या जोरावर शोधल्या जातात, तेव्हा काय होतं याचा थरार म्हणजेचं ही कादंबरी. यातलं बाजिंदा हे पात्र नि त्याचा या प्रवासाशी असलेला संबंध काळजाचा ठोका चुकवणारा आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागात दडलेली ती रहस्यं, प्राचीन विद्या नि एका पित्याची आपल्या मुलाला परत मिळवण्यासाठी चाललेली धडपड… हे सगळं वाचताना मन सुन्न होतं.  लेखकांनी फक्त सस्पेन्स निर्माण केला नाही तर त्यांनी ‘मेटाफिक्शन’चा इतका सुंद...

रारंग ढांग ❤️💙

इमेज
“जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रह जाता है?” हे वाक्य वाचलं अन् काही क्षण पुस्तक बंद करून शांत बसलो. प्रश्न साधा वाटतो, पण उत्तर मात्र तितकं सोपं नाही. कदाचित म्हणूनच हे पुस्तक संपलं तरी तो प्रश्न अजूनही मनात फिरत राहतो. प्रभाकर पेंढारकर यांनी 1981 साली लिहिलेली ‘रारंग ढांग’ ही केवळ 168 पानांची कादंबरी आहे. पण या 168 पानांमध्ये त्यांनी हिमालयाचा जो अनुभव उभा केला आहे, तो निव्वळ अविस्मरणीय आहे. पुस्तक वाचताना हिमालय फक्त डोळ्यांसमोर उभा राहत नाही, तर त्याची थंडी, त्याचं वैभव, त्याची भीती नि त्याचं एकाकीपण सुद्धा जाणवू लागतं. कादंबरीचा नायक विश्वनाथ मेहेंदळे. मुंबईतील सुरक्षित नि चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो हिमालयातील दुर्गम भागात जातो. जिथे Border Roads Organisation उभ्या कड्यांमध्ये रस्ते खोदत असते. जिथे अनेक फूट बर्फ पडतो, ऑक्सिजन कमी असतो नि प्रत्येक दिवस हा जगण्यासाठीचा संघर्ष असतो. पण प्रश्न पडतो एखादा माणूस एवढं सगळं सोडून अशा ठिकाणी का जातो? नि त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण नकळत या कादंबरीच्या प्रेमात पडतो. माझ्या मते ही कादंबरी तीन वेगवेगळ्या लढायांची गोष्ट ...