महामाया निळावंती…🌸❤️
या कादंबरीचं केंद्रस्थान आहे ‘निळावंती’ची ती प्राचीन आख्यायिका. असं म्हणतात की, निळावंती हा असा एक ग्रंथ आहे जो वाचणाऱ्याला निसर्गाची भाषा समजते, प्राण्यांशी संवाद साधता येतो, पण तो ग्रंथ वाचणारा एकतर वेडा होतो किंवा त्याचा अंत होतो. या आख्यायिकेभोवती सुमेध दादा यांनी विणलेलं जाळं थक्क करणारं आहे. कथानकात येतो तो विक्रम विभूते एक वैज्ञानिक, ज्याचा तर्कशास्त्रावर विश्वास आहे. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात एक न भरून येणारं दुःख येतं, जेव्हा तो आपल्या मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपडू लागतो, तेव्हा विज्ञानाची चौकट मोडली जाते. विज्ञानाने नाकारलेल्या गोष्टी जेव्हा मानवी भावनेच्या नि हट्टाच्या जोरावर शोधल्या जातात, तेव्हा काय होतं याचा थरार म्हणजेचं ही कादंबरी. यातलं बाजिंदा हे पात्र नि त्याचा या प्रवासाशी असलेला संबंध काळजाचा ठोका चुकवणारा आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागात दडलेली ती रहस्यं, प्राचीन विद्या नि एका पित्याची आपल्या मुलाला परत मिळवण्यासाठी चाललेली धडपड… हे सगळं वाचताना मन सुन्न होतं. लेखकांनी फक्त सस्पेन्स निर्माण केला नाही तर त्यांनी ‘मेटाफिक्शन’चा इतका सुंद...