पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परका ♥️

इमेज
2 दिवसांपूर्वी 'आल्बेर काम्यू'या साहित्य साठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या लेखकाच्या मुळ फ्रेंच भाषेत 1942 साली 'लेत्रांजे' तर लंडनमध्ये 'द आऊटसायडर' या नावाने प्रकाशित झालेल्या 'कादंबरीचं नुकतंच आलेलं मराठी अनुवाद 'परका' वाचून पूर्ण केलं.मराठीमधे अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे.जो एकंदरीत फार वाचनीय झालेला आहे. फ्रेंचांची वसाहत असणारा 1930-40 च्या दरम्यानचा उत्तर आफ्रिकेतला अल्जीरिया देश. त्याची राजधानी अल्जीअर्स. या अल्जीअर्समध्ये राहणाऱ्या 'मेर्सो' च्या आईचं निधन होतं. मेर्सो तिच्या दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्सोच्या आयुष्यात कमी- अधिक व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दरम्यान, ऊन, आजूबाजूचे आवाज, माणसं, गाड्या हे सगळं त्याला जाणवत राहतं. मग अशातच अनपेक्षितपणे समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो. त्याच्या विरोधात खटला उभा राहतो. हे सगळं कसं होत जातं? खून का होतो ? खटल्यात काय होतं? या सगळ्याची गोष्ट खुद्द मेर्सोच्या तोंडून सांगणारी 'परका' ...

We Read 'रविवार विशेष'पुस्तकांची यादी क्रमांक :- 2 ...♥️

इमेज
कृपया संपूर्ण यादी शेवटपर्यंत वाचूनच पुस्तके निवडावी....🌱 https://wa.me/7066495828 __________________________________________ 1)प्रकाशवाटा -प्रकाश आमटे मुळ किंमत - 200₹ We read Price - 185₹घरपोच.(शिपिंग फ्री) # Recommended 2)चतुर -प्रणव सखदेव मुळ किंमत - 240₹ We Read -240₹घरपोच (शिपिंग फ्री) 3)प्रिय इंदिरा -पंडित जवाहरलाल नेहरू मुळ किंमत - 300₹ We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री) 4)श्यामची आई ~ साने गुरुजी मुळ किंमत - 180₹ We Read -160₹घरपोच (शिपिंग फ्री) 5)आई समजून घेताना -उत्तम कांबळे मुळ किंमत -300₹ We Read -265₹घरपोच (शिपिंग फ्री) 6)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :- प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा  मुळ किंमत - 250 We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री) #StronglyRecommended 7)जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन -पं.जवाहरलाल नेहरू 1 आणि 2 खंड मुळ किंमत -1500₹ We Read -750₹घरपोच (शिपिंग फ्री) 8)भुरा -शरद बाविस्कर मुळ किंमत - 500 We read किंमत - 425₹घरपोच (शिपिंग फ्री) #Bestseller 9)वाट तुडवताना -उत्तम कांबळे मुळ किंमत - 250 We read Price - 220घरपोच.(शिपिंग फ्री) #StronglyRecommended 1...

अंतिम अरण्य ♥️

इमेज
निर्मल वर्मा लिखित 'अंतिम अरण्य'ही हिंदी भाषिक कादंबरी काही दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली.एका वेगळ्याच विश्वात जाऊन आल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.यातील कथानक आणि पात्रांनी मला त्यांच्या प्रेमात पाडायचं काम केलं.कळतं/नकळतपणे या कादंबरीने खूप काही शिकवलं.आजूबाजूला बघण्याची एक नवीन दृष्टी दिली.यातील काही संवादाने हृदयात घर केलं,तर अनेकवेळा मला अंतर्मुख करायचं काम सुद्धा केलं.वाचत असताना मी पूर्णपणे यामध्ये गुंतून गेलो होतो. यातील पात्रांशी एकरूप झालो होतो.हे कथानक जणू माझ्यासमोरच घडतोय असं मला वाटतं होतं.एकंदरीत यातील प्रत्येक पात्र माझ्याआजूबाजूला मला वावरताना दिसतं होतं.मी आतापर्यंत वाचलेल्या काही मोजक्या कादंबऱ्यापैकी एक उत्कृष्ट अशी कादंबरी वाचल्याची प्रचिती मला आली. 'सोनी लिव्ह'वरील 'निर्मल पाठक की घर वापसी'या वेबसिरीज मधून मला ह्याबद्दल कल्पना मिळाली होती.तेव्हापासुन मी ही कादंबरी वाचण्यासाठी कमालीचा उत्सुक होतो.'निर्मल वर्मा सरांची ही शेवटची आणि त्यांच्या इतर कादंबऱ्यापैकी उजवी असलेली ही कादंबरी फार अप्रतिम अशी आहे.जी प्रत्येक वाचका...

संवेदनशीलता🥺

इमेज
माझं अति संवेदनशील होणं कधी कधी मला फार भयानक वाटू लागतं.छोट्या छोट्या गोष्टी ज्या इतरांसाठी नॉर्मल असतात त्या गोष्टी मात्र मला रडायला भाग पाडतात.इमोशनल असणं हे जरी मी माझी ताकद समजत असलो तरीही मला कधी कधी हे विचित्र वाटतं असतं.संवेदनशीलता मी काही केल्या लपवू शकत नाही.कितीही लपवली तरीही ती आपसूकच डोळ्याच्या वाटे बाहेर पडते.मागे पंचायत 2 बघताना शेवटच्या सिन ला आईच्या मांडीवर डोकं टेकून किती रडलो होतो याची मला कल्पना नाही.. असंख्य पुस्तके वाचत असताना सुद्धा हे नेहमी घडतं असतं.एखादं प्रसंग वाचून डोळ्यांतून अश्रू कधी येतात हे मला सुद्धा कळतं नाही.रडायचं नाही हे अनेक वेळा स्वतःला बजावून सुद्धा मी स्वतःला थांबवूच शकत नाही.कोणाला रजा देणे मला फार अवघड जात.एखाद्याला प्रथमच भेटलो असलो तरीही निरोप देताना मनात एक वेगळीच भावना दाटून आलेली असते.हे असं का घडतं नेमकं ठाऊक नाही.एवढा संवेदनशील का आणि कशामुळे झालो काही आयडिया नाही.पण हे सुद्धा पुस्तक वाचनाने,पुस्तक जगल्याने किंवा काही प्रसंग जास्तच फील केल्याने झालं असावं बहुतेक..आणि मुळात हेच आपण Humanist असल्याचा पुरावा असावं..न भेटलेल्या ...

We Read अंतर्गत25 हटके आणि महत्वपूर्णवाचनीय पुस्तकांची यादी...♥️

इमेज
कृपया यादी पूर्ण वाचावी आणि आपल्या वाचन प्रेमीं मित्रांसोबत शेअर करावी..🌱 संपर्क :- We Read ♥️ https://wa.me/7066495828 जॉईन ग्रुप :- https://chat.whatsapp.com/HC172mr6hrrJ7iNYTV1nrx __________________________________________ 1)शिवकालीन महाराष्ट्र -डॉ.अ रा We read :-225 घरपोच (शिपिंग फ्री) शिवकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात, समकालीन साधनांच्या साहाय्याने १७ व्या शतकातील आर्थिक जीवनाचा विचार प्रथमच इतक्या विस्तृतपणे मांडला आहे. मराठ्यांचे राज्य म्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट अथवा सरंजामशाही नसून ते 'बहुत' जनांसी आधारू असे लोकांचे राज्य होते, त्या राज्याच्या राजमुद्रेत 'भद्राय' राजते अशी अक्षरे होता, आणि 'धाकुटपणा'पासून माणसाचे माणस वळखतात असे अभिमानाने म्हणणा-या 'स्वामी'ने निर्माण केलेले ते 'कल्याणकारी' राज्य होते त्याचा विस्तार छोटासा असला तरी 'आर्थिकदृष्ट्या' त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे विवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे आगळे-वेगळेपण आहे. 2)अभंग तुकयाचे ( चिकित्सात्मक ...

माय डियर थोरो गुरुजी ♥️

इमेज
कसं काय ? मजेत ना ? I Know की तुम्ही जेथे सुद्धा असाल तेथे सुखी आणि समाधानीच असाल. तेथे सुद्धा तुम्ही काहीतरी युनिक आणि हटकेच करत असणार ही मला खात्री आहे.कारण तुमचं हयात असतानाचा अवघ्या 43 वर्षाचा आयुष्य बघितल्यावर तुम्ही किती अफलातून आणि ग्रेट होता याची प्रचिती आता येतं आहे.पृथ्वीतळावर तुम्ही ज्याप्रमाणे जगला,ठीक त्याप्रमाणे तुम्ही तेथे सुद्धा वास्तव्य करत असाल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.तुमचं इतरांपेक्षा वेगळं सच्च्यापणाने जगणं,वागणं, आगळवेगळं प्रयोग करणं,निसर्गाबद्दल असलेली तुमची काळजी/ओढ,तुमचं कमालीचं निरीक्षण, तुमचे भन्नाट विचार आणि एकंदरीत तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आज साऱ्या जगाला कळालं आहे.अमेरिकन असून सुद्धा संपूर्ण जगाला आपलासा वाटणारा तुमच्यासारखा लेखक,विचारवंत आणि निसर्गवादी पुन्हा होणे नाही.हे सर्वांना आता कळून चुकलंय. आपण जरी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला असला पण तरीही आपले विचार आजच्या युगात पूर्वीपेक्षा जास्त प्रासंगिक आहेत.त्याकाळापेक्षा आजच्या काळात आपल्या विचाराची जास्त गरज विश्वाला आणि समस्त मानवजातीला आहे.आजच्या स्वार्थी मानवाच्या हातान...

दिवस काही घर बांधून राहत नाही....♥️

इमेज
व्यक्त होत जा,बोलत जा कुटुंब व मित्रांच्या सोबत वेळ घालवत जा.मनातलं दुःख मनातच दाटून ठेवत जाऊ नका,तो इतर चांगल्या मित्रांसोबत शेअर करत जा. "शरीराची जखम उघडी केल्याने चिघळते, तर मनाची जखम उघडी ठेवल्याने बरी होते'हा वाक्य एकदम योग्य आहे.मित्रांनो आत्महत्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही.आजकाल तरुणांमध्ये नैराश्य खूप वाढत चाललं आहे.. सतत बिघडणाऱ्या तब्येतीमुळे व समाजात घडत जाणाऱ्या घटनेमुळे काही 2 वर्षांपूर्वी मी सुद्धा याचा सामना केला आहे आणि यातून बाहेर आलोय.अचानकच नैराश्याने मला सुद्धा गाठलं होत घरी/बाहेर कुठेच करमत नव्हतं,फार एकटं एकटं वाटत होतं,कोणत्याही कामात मन लागत नव्हतं,रोज रोज तेच तेच  हे कधी पर्यत चालणार ??हाच विचार मनात फिरत होता, आपला जगून फायदा तरी काय ??एवढं हे कशासाठी करायचं ??समाज काही सुधरत नाही मग आपण एवढं अट्टाहास का करायचं ?? CSE सोडून एखादा व्यवसाय करावा आणि आपण आपलं बघावं कोणी तिकडे मरत तर मरू द्या, त्याच आपल्याला काय करायचं ?? कशाला उगीच समाज/देश/गरीबांच्या बाबतीत विचार करायचं ??इत्यादी इत्यादी प्रश्न मनाला भेडसावत होते.. आपण सुद्ध...

थोडं मनातलं ♥️

इमेज
आयुष्यात आजपर्यंत फक्त एकाच वेळी  तुटून पडलो त्याबद्दल व्यक्त व्हावं वाटलं.🌿 2017 ला 12th पास झालो.पुण्याला गेलो,काही कारणाने परत येऊन घरीच राहून अभ्यास करायचं ठरवलं.काकाच्या बंद पडलेल्या खोलीत स्वतःचा विश्व बनवलं.हाच आपला पहिला वहिला 'स्टडी बंकर'होय.2018 ते 2019 Cse चा मनापासून सर्वकाही विसरून अभ्यास केलं.अवांतर वाचन सुरूच होतं. 2019 च्या ऑक्टोबर मध्ये अनपेक्षितपणे आरोग्याने साथ सोडली आणि येथूनच मी मागे पडत गेलो.येथून अभ्यास बंद झाला.परत परत हॉस्पिटलमध्ये जाऊन अस्वस्थ वाटतं होतं त्यामुळेच एकटेपणाची सुद्धा जाणीव व्हायला सुरुवात झाली.गल्लीत जवळचा म्हणावं तसं कोणीही मित्र नव्हतं.होती ती फक्त 'अर्पिता' तिला बोलूनच थोडं छान वाटायचं. आमचं एकमेकांवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं.खूप काही वेगळी स्वप्ने बघितलेली होती आम्ही.  'Long Distance Relationship' असून सुद्धा आम्ही एकमेकांच्या जवळच होतो असं वाटायचं.एकंदरीत खूप भारी होतं आमचं नातं.पण परत परत आजारामुळे मी पूर्णपणे तुटलो होतो.माझं भविष्य अंधकारात दिसतं होतं.दिशा मिळतं नव्हती.समजून घेणारं आणि समजावून सांगणार ...

खुलूस ♥️~काळोखात हरवलेल्याचांदण्याची स्पंदनं......

इमेज
काल समीर गायकवाड सरांच नुकतंच प्रकाशित झालेलं नवकोरा कथासंग्रह 'खुलुस' वाचून पूर्ण केलं आणि विचारांच्या समुद्रात बुडालो.पहिल्या कहाणीपासून तर शेवटी लेखकांनी केलेल्या प्रत्येकाशी संवादापर्यत डोळ्यात अश्रू होते आणि डोक्यांत विचारांचा काहूर माजला होता.तो पुस्तकं समाप्त झाल्यानंतर सुद्धा सुरूच होता आणि आहे.यातील प्रत्येक कथेने मला अस्वस्थ केलं,सुन्न करून विचार करायला भाग पाडलं आणि त्या स्त्रियांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अनेक बाबतीत बदलण्याचं काम केलं.'मंटोच्या'काही कहाण्या वाचल्यापासूनच या विश्वाकडे बघण्याची माझी नजर काही बाबतीत बदलली होती,त्या स्त्रियांप्रति संवेदना जागृत झाल्या होत्या आणि एक आदर-सन्मान निर्माण झाला होता.जो खुलूस खरंच  वाचून अजून कितीतरी पटीने वाढला आहे.आपल्या समाजाचा एक हिस्सा या स्त्रिया सुद्धा आहेत त्यांना डावलून, हिनवून कदापी चालणार नाही ही शिकवण मला खुलूस ने दिली असे मी म्हणू शकतो. खुलूस वाचून मी भारावून गेलोय.लेखकांचा बोट धरून जणू मीच त्या काळोखात खितपत जगणाऱ्या स्त्रियांशी संवाद करून आलोय असं मला वाटतं आहे.त्यांच्या वेदना,दुःख,दर्द,पीड...