पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झाडाझडती – मन हेलावून टाकणारा अनुभव 💔

इमेज
विश्वास पाटील यांची 'झाडाझडती' ही कादंबरी मी बारावीत असताना प्रथम वाचली होती. तेव्हा अनेक गोष्टी नीट समजल्या नव्हत्या, पण काहीतरी मनाला भिडलं होतं, असं आज वाटतंय. आता, मास्टर्स करत असताना पुन्हा एकदा ही कादंबरी वाचतोय – कारणही सांगता येणार नाही, पण आतून वाटलं की पुन्हा वाचावी. इंग्रजी अभ्यासाच्या गर्दीतही माय मराठीशी नाळ जोडलेली ठेवायची हे ठरवलेलं आहे, नि 'झाडाझडती' त्या नाळेला नवसंवेदना देतेय बस्स एवढंच. हि कादंबरी वाचताना असं जाणवलं की आपण बहुतेक वेळा धरणग्रस्तांच्या वेदनांकडे फारच वरवर पाहतो. धरण बांधायचं म्हणजे विकास, शेतीला पाणी, वीज निर्मिती, उद्योग नि संपूर्ण राज्याच्या प्रगतीचा मार्ग असं गणित आपल्या डोक्यात सहज तयार होतं. मलाही पूर्वी तसंच वाटायचं. पण ‘झाडाझडती’ वाचल्यानंतर लक्षात आलं की त्या विकासासाठी कोणाच्या बळावर इमारत उभी राहते ? त्या जमिनी, ती घरं, ती माणसं नि त्यांची आयुष्यं कुठे जातात? या कादंबरीत विश्वास पाटील यांनी धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचा, तिथल्या माणसांचा संघर्ष फार प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे. सरकारच्या आश्वासनांपासून त...

जग बदलणारे ग्रंथ ...❤️💜

इमेज
हे दीपा देशमुख मॅम यांनी लिहिलेलं हे अप्रतिम पुस्तक मी प्रकाशित होताच वाचलं होतं नि तेव्हा मॅमला एक छोटसं पत्र लिहून माझी प्रतिक्रिया दिली होती.तेव्हापासून मला याबद्दल एकदा विस्तृत लिहायचं होतं त्यामुळे अखेर आज मी शब्द याबद्दल लिहितोय...❤️ हे एक अप्रतिम पुस्तक आहे, ज्यामध्ये लेखिकेने जगाच्या इतिहासात क्रांती घडवणाऱ्या 50 ग्रंथांचा परिचय करून दिला आहे. हे पुस्तक वाचताना मला एक वेगळाच आनंद मिळाला. माझ्या वाचनाच्या विचारांमध्ये यामुळे खूप बदल झाला. पुस्तकाची सुरुवात लेखिकेच्या मनोगताने होते, जिथे त्या वाचनाचं महत्त्व नि ग्रंथांचं आयुष्यातलं स्थान सांगतात. त्यांचे शब्द इतके प्रभावी आहेत की, वाचकाला पहिल्याच पानापासून या प्रवासात सामील व्हावंसं वाटतं. प्रत्येक ग्रंथाची कहाणी, त्याचा इतिहास नि त्याने समाजावर काय परिणाम केला हे सगळं वाचताना आपण त्या काळात, त्या विचारांमध्ये हरवून जातो. मला हे पुस्तक वाचताना जणू एका मोठ्या ज्ञानसागरात पोहायला मिळाल्यासारखं वाटलं. हे पुस्तक माणसाच्या विचारांना नि स्वप्नांना सलाम करतं, कारण यातले ग्रंथ फक्त कागदावरचे शब्द नाहीत, तर ते माणुसकीला नव...

दुनियादारी....🌼❤️

सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी’ ही मराठी साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय नि काळाच्या कसोटीत उतरलेली कादंबरी आहे. कॉलेज जीवन, मैत्री, प्रेम, मत्सर, कुटुंबातील ताणतणाव, गुन्हेगारी पार्श्वभूमी नि बदलत्या नातेसंबंधांवर ही कथा आधारित आहे. पुण्याच्या सिटी कॉलेज परिसरात घडणाऱ्या या कथेतील प्रत्येक पात्र आपल्याला इतकं जवळचं वाटतं की, त्यांचं दु:ख, संघर्ष, आनंद आपणही अनुभवतो. मुख्य पात्र श्रेयस देशपांडे एका श्रीमंत नि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेला मुलगा. कॉलेजमध्ये आल्यावर त्याचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जातं. शिरीष, दिग्या, मृणाल, मीना नि अप्पा यासारखी पात्रं सुधीरच्या आयुष्यात येतात अन् त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. या सगळ्यांमधील नाती अतिशय गुंतागुंतीची, पण त्याच वेळी वास्तवदर्शी नि मानवी भावनांनी भरलेली आहेत. कादंबरीची लेखनशैली सहज, संवादप्रधान नि चित्रमय आहे. सुहास शिरवळकर सर हे संवादाच्या माध्यमातून कथेला दिशा देतात. वाचकाला सुरुवातीपासूनच कथेत गुंतवून ठेवण्याची त्यांची शैली भन्नाट आहे. ही केवळ एक कॉलेजमधील तरुणांची कथा नाही, तर ती एकूणच समाजाच्या बदलत्या मानसिकतेचं, ना...

सिद्धार्थ ❤️🌼

इमेज
या बुद्ध पौर्णिमेला विशेष करून नोबेल पुरस्कार विजेते लेखक हरमान हेसे यांच्या जागतिक स्तरावर गाजलेल्या "सिद्धार्थ" या कादंबरीचा अनुवाद मी दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केला. 1922 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 2022 मध्ये 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. एकंदरीत मला ही कादंबरी खूप आवडली नि भावली. दुसऱ्या वाचनात काही नवीन आयाम समजले, उमजले. खूप काही नव्यानं शिकवलं या कादंबरीनं. मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं मला इथं मिळाली. स्वतःचं अध्ययन करण्यासाठी विशेष प्रेरणा मिळाली. कादंबरीचं नाव जरी 'सिद्धार्थ' असलं, तरी ती गौतम बुद्धांबद्दल नाही. या कादंबरीत गौतम बुद्धांच्या समकालीन एका मनस्वी भारतीय तरुणाचा आत्मशोध दाखवला आहे. कादंबरीचा काळ मात्र बुद्धांच्या काळातीलच आहे नि यात बुद्ध नि धम्म यांचा उल्लेख आलेला आहे. एकंदरीत हरमान हेसे यांनी गौतम बुद्धांच्या कथेची वेगळ्या प्रकारे पुनरमांडणी केली आहे – पण त्याच अर्थानं, त्या गाभ्यानं. या कादंबरीचा नायक सिद्धार्थ याच्या जीवनावर बौद्ध नि हिंदू विचारसरणीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. "ज्याला मानवी जीवनाचा खरा अर्थ समजतो तोच ...

गुरू आयोनि लडका...❤️

इमेज
किशोर बळी यांची "गुरू आयोनि लडका" ही अवघ्या 104 पानांची पण अंतर्मनाला हादरवणारी नि आतून विचार करायला लावणारी कादंबरी नुकतीच वाचली. पारधी तांड्यातील एका लहानशा जिल्हा परिषद शाळेची नि त्या शाळेत आलेल्या एका नवख्या शिक्षकाची ही गोष्ट आहे. पण ही फक्त एका शिक्षकाची गोष्ट नाही तर ही आहे त्या शिक्षकाच्या मनात चाललेल्या अस्वस्थतेची, शाळेशी अन् विद्यार्थ्यांशी निर्माण झालेल्या नात्याची व शिक्षणव्यवस्थेच्या ढासळलेल्या वास्तवाची. कादंबरीची पार्श्वभूमी यवतमाळ जिल्ह्यातील गणेशपूर गावातील पारधी तांडा ही आहे जिथे अजूनही गरिबी, अंधश्रद्धा, शिक्षणापासून दूर राहिलेली मुले नि गावकऱ्यांमध्ये असलेली शंका, अविश्वास नि वेगळेपणाचे दुःख दिसून येते. इथे एक शिक्षक येतो नि तो 'गुरुजी' म्हणून पोऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनात थोडंसं उजेडाचं पाणी शिंपडतो. पण हा प्रवास सोपा नाही, ना सहज घडणारा. शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्याला केवळ अध्यापन करायचं नसतं, तर मुलांना शाळेच्या दिशेने ओढून आणायचं असतं, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात, गावकऱ्यांशी संवाद साधायचा असतो. एकेक दिवस जातो तसं...

भुरा 🌼❤️

इमेज
6 वर्षाच्या गॅपनंतर कॉलेजमध्ये आल्यावर पुन्हा एकदा भुरा हे पुस्तक मी नव्याने जाणीवपूर्वक वाचायला घेतलं.इथपर्यंत येण्यामध्ये भुराचा मोठा रोल राहिलेला आहे.यावेळी सलग न वाचता हे पुस्तकं मी तब्बल 15 दिवस वाचलं.एका दिवसात सुद्धा वाचून संपवता आलं असतं, पण मी प्रत्येक पानाशी थांबलो, त्यातली प्रत्येक भावना अनुभवली नि कधी कधी एखादं पान दोन-तीन वेळा वाचून घेतलं नि आवडलेले लेखकांचे नि विशेषतः आईचे विचार हायलाईट करून ठेवले. कारण हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र नाही, तर ते स्वप्न, संघर्ष आणि बदल यांची कहाणी आहे जी मला माझ्या आयुष्याशी खूप जवळची वाटली. भुरा म्हणजे प्रा. शरद बाविस्कर यांचा स्वतःचा प्रवास. एक अशिक्षित घरातून आलेला मुलगा, शाळेत इंग्रजीत नापास झालेला, पण पुढे मेहनतीने शिक्षण घेऊन JNU सारख्या मोठ्या विद्यापीठात प्राध्यापक होणं ही गोष्ट साधी नाही तिच्यामागे जी खडतर वाट आहे, ती समजून घेतल्यावर कमालीची प्रेरणा मिळते. शिक्षणासाठी, पुस्तकांसाठी नि एक चांगलं आयुष्य मिळवण्यासाठी भुराने केलेला संघर्ष वाचताना असं वाटत होतं की मी माझंच आयुष्य पुन्हा एकदा जगतोय. कारण भुराची परिस्थिती, त्या...