दहशतवाद 💔
23 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये घडलेली भीषण घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली. निरपराध नागरिकांवर झालेला हल्ला केवळ व्यक्तींवर नव्हे तर आपल्या सर्वांच्या मानवी मूल्यांवर झालेला फार मोठा आघात आहे.धर्माच्या नावावर निष्पाप लोकांचा बळी घेणे हे अत्यंत घृणास्पद नि दुःखद आहे. धर्म हा मुळात प्रेम, सहिष्णुता नि करुणेचा संदेश देतो, पण काही लोक त्याचा गैरवापर करून हिंसेचा मार्ग निवडतात. जेव्हा निरागस लोक केवळ त्यांच्या ओळखीवरून मारले जातात, तेव्हा त्यांचे कुटुंबीय कोणत्या यातना सहन करत असतील, याचा विचार केला तरी अस्वस्थ वाटतयं. आई-वडिलांचा अपत्यांवरचा जीव, लहान मुलांचा आधार हे सगळं एका क्षणात संपवलं जातं. केवळ कोणत्यातरी विकृत एका विचारसरणीमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होतं.💔
Terrorism हा आजच्या काळात संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठा धोका बनलाय. दहशतवादाला कोणताही धर्म, देश किंवा जातीशी जोडणं चुकीचं आहे, कारण हिंसा नि भीती यांना कधीच धर्माचा आधार नसतो. दहशतवादी कारवाया जगभरात सर्वच समाजांवर घातक परिणाम घडवतात.मग ते भारतातले हल्ले असो, अमेरिकेतील 9/11 असो, फ्रान्समधले Paris attacks असो किंवा इतर कुठेही. दहशतवादामध्ये फक्त निरपराध नागरिकांचे जीव जातात, कुटुंबं उद्ध्वस्त होतात नि समाजामध्ये अविश्वास व अस्थिरता वाढते. म्हणूनच, दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, तर चुकीच्या नि हिंसक विचारांवर असलेली लढाई आहे.
Humanity,सहिष्णुता नि शांतता ह्या मूल्यांचा आधार घेऊनच आपण दहशतवादाचा मुकाबला करायला हवा. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी प्रेमाचा संदेश पसरवला पाहिजे.सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे Cross-Border Terroism वर फोकस करायला हवं. मुळात Good education, Dialouge नि understanding यामधूनच आपण नवीन पिढीला दहशतवादापासून दूर ठेवू शकतो. कोणत्याही प्रकारची हिंसा योग्य ठरवली जाऊ शकत नाही नि हिंसेला थांबवण्यासाठी सर्व देश, समाज नि मुळात धर्म यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. फक्त एकत्रित प्रयत्नांनीच आपण जगात खरं शांतता नि सुरक्षितता आणू शकतो. म्हणून दहशतवादाचा पूर्ण निषेध करणे नि मानवतेच्या मूल्यांना उंचावणे ही आज काळाची गरज आहे.
काही मुट्ठभर चुकीच्या विचारांच्या लोकांच्या वाईट कृतीसाठी संपूर्ण समाजाला जबाबदार धरणं ही अजून एक अयोग्य बाब आहे.देशबांधवांनी अशा प्रसंगी एक व्हायला हवे,धर्माच्या नावावर एकमेकांपासून तुटू नये.आपली एकता हीच आपली ताकद आहे.आपण एकमेकांना आरोप करून आपापसांत लढून दहशतवाद्याना जिंकू देऊ नये. अशा प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन पीडितांसाठी संवेदना व्यक्त करायला हवी नि माणुसकीचा धागा अधिक मजबूत करायला हवा असं प्रामाणिकपणे वाटतं कारण माणसं जगली पाहिजे माणुसकी जिंकली पाहिजे.🌼💔
निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐😔
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा