We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼
We Read आयोजित केलेल्या स्पर्धेला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार…🩵
या स्पर्धेत आम्हाला एकूण 300 पत्रं प्राप्त झाली. यात 8 वर्षांच्या बालकांपासून ते 78 वयवर्ष असलेल्या ज्येष्ठांपर्यंत सहभागींचा समावेश होता. प्रत्येक पत्रातून उमटलेली भावना, कल्पकता आणि संवेदनशीलता खरोखरच स्पर्धेचं सार्थक ठरली. मूळ नियोजनाप्रमाणे,आलेल्या पत्रांपैकी 3 सर्वोत्कृष्ट पत्रं निवडायची होती. मात्र, लहान वयाच्या मुलांचाही सहभाग लक्षणीय असल्यामुळे त्यांची पत्रं प्रौढांच्या पत्रांप्रमाणे एकत्रितपणे निकालात समाविष्ट करणे योग्य ठरणार नाही, असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही स्पर्धेत दोन गट तयार करण्याचा निर्णय घेतला.
•18 वर्षांखालील गट
•18वर्षांवरील गट
18 वर्षांखालील गटात एकूण 100 पत्रं, तर 18 वर्षांवरील गटात जवळपास 200 पत्रं होती. या विभागणीप्रमाणे प्रत्येक गटातून 3-3 विजेते निवडण्याचे ठरवले गेले.
पत्रांचे परीक्षण करताना आमच्या We Read Team ने सर्व पत्रं वाचून प्राथमिक चर्चा केली नि त्यातून 18 वर्षांवरील गटातील 21 पत्रं व 18 वर्षांखालील गटातील 14 पत्रं पुढील फेरीसाठी निवडली. ही पत्रं आम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांना दिली. आम्ही ठरवलेल्या विविध निकषांनुसार गुणांकन केले, व त्या गुणांवरून अंतिम विजेते निश्चित झाले.
याशिवाय, या स्पर्धेत दोन शाळांनी सामूहिक सहभाग नोंदवला होता. त्या शाळांमधून आलेल्या पत्रांसाठी शाळापुरता स्वतंत्र निकाल ठेवण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येकी एक विजेता निवडण्यात आला.
यापलीकडे अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.अनेक सहभागी यांनी आपली दुःखं, वेदना आणि अंतःकरणात साठून राहिलेल्या भावना पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केल्या. ज्यांना आपली वेदना कुठे मांडता आली नव्हती, त्यांना या स्पर्धेमुळे पहिल्यांदाच स्वतःचं मन मोकळं करता आलं. मानसशास्त्रात ज्याला “Catharsis” म्हणजेच दुःखाचं विरेचन म्हणतात, तो अनुभव या स्पर्धेत अनेकांनी घेतला. मनात दडवून ठेवलेली शब्दं अखेर बाहेर आली, ही भावनांची देवाणघेवाण, हे मन मोकळं करण्याचं माध्यमच या स्पर्धेचा खरा ठेवा ठरलं. काही हरवलेले अश्रू, आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे बोलून मोकळं होण्याचा आनंद हाच या स्पर्धेचा सर्वात मोठा विजय ठरला.
महत्त्वाची सूचना :
निवडलेली सर्व पत्रं We Read परीक्षक मंडळाच्या दोन तपासणी फेऱ्यांतून गेली आहेत. शेवटच्या फेरीत 21पत्रांना परीक्षकांनी थेट गुणांकन केले आहे. त्यामुळे जाहीर झालेले निकाल हेच अंतिम निकाल असून, यात कुठलाही बदल होणार नाही.🌿
~We Read 💙
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा