आयुष्याची डायरी वगैरे.....✨♥️
अश्या असंख्य गोष्टी आहेत ज्या मला शिकायच्या आहेत आणि मी त्या रोज शिकतोय.मला खुप काही शिकायला,नवीन काहीतरी करायला आवडतं.पण सुरुवातीपासून गावाच्या एका गल्लीतच मर्यादित राहिल्याने काही गोष्टींवर मर्यादा आल्या.
खूप काही करायचं, शिकायचं होतं आणि आहे.पण काही कारणाने ते करू शकलो नव्हतो तरीही आता ते भविष्यात मात्र करायचं आहे. ही मनाशी खूणगाठ बांधली आहे.असंख्य गोष्टीबद्दल खूप उशिरा कळालं त्याबद्दल कधीकधी दुःख होतो.
आता जे मार्गदर्शन करणारे,योग्य मार्ग दाखवणारे आणि चुका लक्षात आणून देणारे पूर्वी मिळाले असते तर आयुष्य फार नाही पण थोडं तरी वेगळ्या वळणांवर असलं असतं असं वाटतं....
' But Its ok' जे झालं ते झालं."जो होता हैं वो अच्छे की लिये ही होता हैं"हा विचार करून मी मार्गक्रमण करतोय.
माझी आयुष्याबद्दल अजिबात तक्रार नाही. मला आजपर्यंत जे काही मिळालं आहे तो सुद्धा असंख्य जणांच आजसुद्धा स्वप्न आहे.हे मला कळतं.
मी अजूनपर्यंत संघर्ष वगैरे केलेला नाही .पण मला तो करायचं आहे,अनुभव घ्यायचं आहे.
मी संघर्षासाठी आता तयार आहे.'बापाच्या' पैशांवर मला जगायचं नाही.जे काही करायचं आहे ते स्वतःच.
एक छोटीशी झोपडी असेल ती स्वतःची आणि सेल्फ मेड असेल हे ठरवलं आहे.कुठलीही पार्श्वभूमी वगैरे काय म्हणतात ते नाही.सुरुवात शून्यातून केलेली असल्याने अजिबात भिती वाटतं नाही.
मुळात आजपर्यंत कम्फर्टझोन मध्ये जगलोय तो कम्फर्ट झोन सोडायचं प्रयत्न करतोय.यामध्ये काही बाबतीत यशस्वी सुद्धा झालोय..स्वतःशी रोज लढतोय,स्वतःशी स्पर्धा करतोय. कधी जिंकतोय तर कधी हरतोय सुद्धा.
अभ्यास,वाचन वगैरे न चुकता रोज करतोय.दिनक्रम बदललं आहे,आयुष्याची वाट सोपी आणि सरळ दिसतं आहे.पूर्वीप्रमाणे भविष्य अंधार वगैरे काहीही आता दिसतं नाही.नौकरी,करियर वगैरेची चिंता नाही.सुखाने आयुष्य जगू शकेल कुटुंबासोबत इतर 1/2 जणांचा सुद्धा पोट भरू शकेल एवढं पैसा कमावण्याची लायकी आणि प्लॅन मी तयार केला आहे.त्याबद्दल मला चिंता वाटतं नाही.
एवढं सर्वकाही सुरु असताना कधी कधी विचित्र वाटतं.ज्या भागात राहतो त्या भागात आता कधी कधी राहावंस वाटतं नाही.कारण,एवढंच की मनातील दोन शब्द बोलायला प्रत्यक्ष येथे आजूबाजूला कोणी नाही.गल्ली दिवसभर भयाण पडलेली असते.मित्र असंख्य आहेत पण त्या पद्धतीचा मित्र आजूबाजूला कोणी नाही.रोज असंख्य कॉल्स येतात पण प्रत्यक्षात कोणीही नसतो बाजूला.त्यामुळे स्टडी बंकर,पुस्तके,गाणे,चित्रपट,सोशल मीडिया,अभ्यास आणि मी बस्स एवढंच सध्या माझं आयुष्य आहे.
एकंदरीत अभ्यास आणि पुस्तके सोडून हाच माझा विरंगुळा आणि मनोरंजनाचा साधन आहे. सांगायचा मुद्दा हाच की दिसतं तेवढं सोपं नसतं. समोरचा व्यक्ती तुम्हाला हसत वगैरे दिसतं असेल तर तो आनंदीच असेल असं नाही.त्यामुळे कोणालाही न भेटता,बोलता त्याबद्दल गैरसमज करून घेणे चुकीचं आहे.तो कोणत्या परिस्थितीत असतो त्याचं त्याला ठाऊक असतं.
बाकी मी कायम आनंदी आणि खरं जगायचं प्रयत्न करत आलोय आणि शेवटपर्यंत असणार आहे.बुद्ध आणि त्यानंतर थोरो आयुष्यात आल्यापासून नैराश्य वगैरे मला आता गाठू शकत नाही.कारण, माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मला बुद्ध आणि थोरो गुरुजींनी दिली आहेत.
आता एकांतवास मला आवडतो.आणि याच कारणाने मी बुद्ध व थोरोचा फॅन झालोय.गौतम बुद्धानंतर या अवलियाने दाखवलेला मार्ग मला प्रिय वाटतो आणि मी याचं वाटेवर चाललोय..भविष्यात खूप काही करायचं आणि शिकायचं. सध्या फोकस फक्त अभ्यासावर आहे.अभ्यास सांभाळून We Read सुद्धा सांभाळतोय.
मुळात पुन्हा आजारी पडायचं नाही ही गाठ मनाशी बांधली आहे.छोट्याशा आजारामुळे 2/3 वर्ष मागे गेलोय.त्यामुळे 'Health is Wealth' हा मंत्र मला तंतोतंत पटलं आहे.आता ध्येय गाठायच्या तयारीत आहे..Aim खूप आहेत त्यामुळे लहान स्टेप्स टाकतोय.फक्त एकच Aim च्या मागे लागायचं बंद केलंय.
रस्ता भटकलेलो नाही आणि भटकणार सुद्धा नाही.मार्ग तोच आहे पण त्या मार्गाला विविध वाटा निर्माण करतोय.✨
Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा