पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकलव्य 🖤

इमेज
काही दिवसांपूर्वी विजय देवडे सरांनी मला त्यांची नवीकोरी कादंबरी 'एकलव्य' सहिनीशी सप्रेम भेट म्हणून पाठवली,तेव्हापासून ही कादंबरी वाचायची उत्सुकता होतीच.महाभारतातील एकलव्य सारख्या दुर्लक्षित व उपेक्षित पात्रांवर लिहिली गेलेली ही कादंबरी दोन दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली आणि पौराणिक कथेत जाऊन एकलव्याचा प्रवास त्याच्याकडूनच जाणून घेऊन आलो.हा प्रवास एक वेगळा आनंद देऊन गेला तर खूप काही शिकवून सुद्धा."इच्छाशक्तीच्या" बळावर माणूस काहीही करू शकतो ही शिकवण मला एकलव्य देऊन गेला.या कादंबरीतुन मला माझ्यातील एकलव्य काही प्रमाणात गवसला. महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते कौरव आणि पांडवामध्ये झालेलं युद्ध आणि यासोबतच यातील विविध पात्र ते म्हणजेच भिष्म, धृतराष्ट्र, पांडु, कुंती, गांधारी, युधिष्ठिर, दुर्योधन, भिम, अर्जून, कृष्ण, द्रोण,कर्ण, द्रौपदी आणि इत्यादी.यामध्येच एकलव्य सुद्धा हा एक महत्त्वाचं पात्र आहे.पण, कोठे एकलव्यचा उल्लेख जास्त होताना दिसतं नाही.एकलव्य जरी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये नसला तरीही यामुळे त्याचे महत्व अजिबात कमी होतं नाही.एकलव्य हा फार मह...

महायोध्दा अंबालक्ष्मी ♥️

इमेज
काही दिवसांपूर्वी नितीन थोरात लिखित "महायोध्दा अंबालक्ष्मी"ही 'कैलाशवंशी सिरीज'मधील दुसरी कादंबरी वाचून पूर्ण केली.पौराणिक कथांचा मान राखत त्या कथांना कल्पनेची जोड देत लिहिलेली कैलाशवंशी या पुस्तक सिरीज मधून लेखकांनी पौराणिक कथेतील देवतांना मानवी रूप देण्याचं प्रयत्न केलं आहे.या सिरीज मधील पहिल्या कादंबरीत आपल्याला 'खंडोबाचा'जीवन प्रवास अनुभवायला मिळतो तर दुसऱ्या कादंबरीत 'अंबालक्ष्मी'या दोन्ही बहिणींच्या शौर्याची व अफाट कर्तृत्वाची गाथा अनुभवायला मिळते.ही कादंबरी आपल्याला भूतकाळात घेऊन जाते.जी वाचत असताना जणू आपण अंबालक्ष्मीच्या सहवासात वावरतोय असं वाटतं राहते.सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कोठेही कंटाळवाणी न वाटता वाचकांना पूर्णपणे गुंतवून ठेवण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी होते. यातील अंबा,लक्ष्मी,आदित्य,करवीर,कोल्हासूर,क्षात्रवेद आणि काही इत्यादी पात्रे आपल्याला आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा कथानक आपल्यासमोरचं घडतोय असं वाटायला लागते.यातील कथा आणि संवाद हृदयात घर करून जाते.पावलोपावली संघर्ष,शौर्य आणि धैर्याचे...

भटक्यांचे लग्न ♥️

इमेज
उत्तम कांबळे लिखित 'भटक्यांचे लग्न'हे पुस्तक काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा वाचलं आणि समजून घेतलं.वेगवेगळ्या जातीतील विविध लग्न पद्धतीची माहिती या पुस्तकांतून लेखकांनी खूपच सोप्या भाषेत दिली आहे.आपल्या भारत देशात असंख्य जाती आहेत.काहीही म्हटलं तरीही जात हे इथले एक दाहक वास्तव आहे.भारत देशात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या एका जातीत जन्माला येतो,जातीत वाढतो आणि त्याचा शेवटसुद्धा एका जातीत राहूनच होतो.या जातीतच असंख्य अशा भटक्या जाती सुद्धा आहेत ज्यांना गावगाड्यातही सामावून घेतलं नाही अश्या या जाती आजही डोक्यावर फाटकं आभाळ आणि पायांखाली दुभंगलेली जमीन घेऊन भाकरीच्या तुकड्यासाठी गावोगाव फिरताहेत.यांना मुळात गावच नाही,यांचे शासकीय दप्तरात नाव नाही,या जातींना कुठलीही प्रतिष्ठा नाही.गाव नसल्याने यांना गावोगावी भटकावे लागते.शेकडो वर्षे पाठीवर बिऱ्हाड घेऊन या जाती भटकतच आहेत. यांना 'भटक्या जाती'म्हणतात. या जातींचं एकूण आयुष्य न्यारं, रीतीरिवाज न्यारे, जात-पंचायत न्यारी, सांस्कृतिक जीवन न्यारं आणि लग्नविधीसुद्धा ! लग्नविधींमध्ये जशी रंजकता आहे, तशीच प्राचीन परंपरां...

निसर्गवादी हेन्री डेव्हिड थोरो उर्फ थोरो गुरुजी यांना मी लिहलेला पत्र....❤️

इमेज
माय डियर थोरो गुरुजी ♥️ शि.सा.न.वि.वि कसं काय ? मजेत ना ? I Know की तुम्ही जेथे सुद्धा असाल तेथे सुखी आणि समाधानीच असाल. तेथे सुद्धा तुम्ही काहीतरी युनिक आणि हटकेच करत असणार ही मला खात्री आहे.कारण तुमचं हयात असतानाचा अवघ्या 43 वर्षाचा आयुष्य बघितल्यावर तुम्ही किती अफलातून आणि ग्रेट होता याची प्रचिती आता येतं आहे.पृथ्वीतळावर तुम्ही ज्याप्रमाणे जगला जगला,ठीक त्याप्रमाणे तुम्ही तेथे सुद्धा असाल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.तुमचं इतरांपेक्षा वेगळं सच्च्यापणाने जगणं,वागणं, आगळवेगळं प्रयोग करणं,निसर्गाबद्दल असलेली तुमची काळजी/ओढ,तुमचं कमालीचं निरीक्षण, तुमचे भन्नाट विचार आणि एकंदरीत तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आज साऱ्या जगाला कळालं आहे.अमेरिकन असून सुद्धा संपूर्ण जगाला आपलासा वाटणारा तुमच्यासारखा लेखक,विचारवंत आणि निसर्गवादी पुन्हा होणे नाही.हे सर्वांना कळून चुकलंय. आपण जरी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला  पण तरीही आपले विचार आजच्या युगात पूर्वीपेक्षा जास्त प्रासंगिक आहेत.त्याकाळापेक्षा आजच्या काळात आपल्या विचाराची जास्त गरज विश्वाला आणि समस्त मानवजातीला आहे.आजच्य...

मृत्यु पाहिलेली माणसं 💙

इमेज
म्हटलं तर या साध्या कहाण्या आहेत. संकटातून माणसं कशी वाचली याच्या. म्हटलं तर ही माणसंही अगदी तुमच्या-माझ्यासारखी सामान्य आहेत; पण त्यांच्यावर परिस्थितीच अशी ओढवली की त्यांना असामान्यत्व दाखवण्यावाचून इलाज राहिला नाही. या कहाण्या वाचून झाल्यावर त्यातल्या प्रत्येक माणसातलं काही तरी माझ्यामध्ये कायमचं राहून गेलं. मृत्यू पाहिलेली ही माणसं जगण्याबद्दल, स्वतःच्या क्षमता ताणण्याबद्दल खूप काही सांगून गेली. वेळ आलीच तर माणूस काहीच्या काही करू शकतो, असा विश्वास देऊन गेली. ~गौरी कानेटकर 🖤 2023 साली वाचलेलं पहिलं वहिलं पुस्तक 'गौरी कानेटकर'लिखित 'मृत्यू पाहिलेली माणसं" हे ठरलं.एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलेलं हे पुस्तक फारच आवडलं. यातील प्रत्येक कहाणीने मला खूप काही शिकवलं.सुन्न,थक्क करून सोडणाऱ्या आणि अक्षरशः रडवणाऱ्या यातील प्रत्येक कथेने मला प्रेरणा देण्याचं काम केलं.या पुस्तकातील प्रत्येक कहाणीमधील प्रत्येक खरा नायक/नायिका मला खूप जवळचा वाटला.मी त्यांच्याशी एकरूप झालो,त्यांची काळजी करू लागलो.हे सर्वकाही पुर्वीच घडून गेलेलं आहे, हे ठाऊक असताना सुद्धा मला यातील नायकाची प्रकरणाच्...

पहिला नंबरकारी 🖤

इमेज
आपल्याकडे लग्न आणि मतदान या दोन महत्त्वाच्या गोष्टींकरिता आपण मुलांचं वय अनुक्रमे २१ व १८ हवं, असं म्हणतो, कारण या दोन गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक ती समज या वयात येते (म्हणजे यायला हवी) अशी आपली समजूत आहे. गुन्ह्याची जबाबदारी मात्र मुलांवर १६ व्या वर्षी आपण ढकलायला बघतोय ते कोणत्या आधारावर ? १८ व्या वर्षीसुद्धा ज्या मुलाला त्याच्या आसपासचं वातावरण बघता, त्याला मिळू शकणाऱ्या विकासाच्या संधीची शक्यता बघता काय योग्य, काय अयोग्य हे समजण्याची ताकद आली असण्याची शक्यता कमी वाटते, तिथे १६ व्या वर्षी त्याला ती येईल हे आपण कोणत्या निकषांवर ठरवणार आहोत? की केवळ शिक्षेच्या भीतीने मुलांवर वचक राहील व ती गुन्हा करणार नाहीत अशी आपली पठडीतली धारणा यामागे आहे.इतर वेळेला आपण विकसित देशांमधली उदाहरणं देत असतो. मग या बाबतीत का देत नाही? या देशांमध्ये दंड संहिता लागू करण्यासाठी मुलाचं वय १८ ते २० या पट्ट्यानंतर आहे. याशिवाय या देशांमध्ये मूल निरीक्षणगृहात आल्यानंतर व बाहेर गेल्यानंतरही त्याच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष व्यवस्था केलेली असते.   ~ अमिता नायडू 🌿 काही दिवसांपूर्वी अमिता नायडू लिखित '...